HW News Marathi
देश / विदेश

येत्या १५ दिवसांत ठाकरे सरकारच्या आणखी २ मंत्र्यांवर राजीनाम्याची वेळ येणार !

मुंबई । राज्यातील ठाकरे सरकार विविध गंभीर प्रकारणांमुळे वारंवार अडचणीत सापडत आहे. यामुळे आतापर्यंत सरकारमधील २ मंत्र्यांवरणआपल्या पदाचा राजीनामा देण्याची नामुष्की देखील आली. त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आणखी एक खळबळजनक विधान केले आहे. “पुढील १५ दिवसांत ठाकरे सरकारमधील आणखी २ मंत्र्यांवर राजीनाम्याची वेळ येईल”, असा दावाच चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, “पुढील १५ दिवसांत ठाकरे सरकारमधील आणखी २ मंत्री राजीनामे देतील. मला नावं विचारु नका. कोणीतरी न्यायालयात जाईल आणि त्यानंतर अनिल परब यांना राजीनामा द्यावा लागेल”, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आधीच ठाकरे सरकार मोठया अडचणीत असताना भाजपकडून होणारा हा दावा राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा आहे.

…तर मग राज्य केंद्राच्या ताब्यात देऊन टाका !

केंद्र सरकारवर वारंवार नाराजी व्यक्त करणाऱ्या ठाकरे सरकारवर यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बोचरी टीका केली आहे. प्रत्येक गोष्टीसाठी केंद्र सरकारलाच जबाबदर धरले जाणार असेल तर मग राज्य केंद्राच्या ताब्यात देऊन टाकावे” असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. “महाविकासआघाडी प्रत्येक गोष्टीसाठी केंद्रालाच जबाबदार धरणार असेल तर ते राज्य तरी का चालवत आहेत?” अशी सवालही यावेळी त्यांनी केला.

“राष्ट्रपती राजवट लागू न करण्यासाठी नेमके शिल्लक तरी काय?”

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, “मी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा असे मी म्हणत नाही. पण आता त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू न करण्यासाठी नेमके शिल्लक तरी काय ठेवले आहे? १८ महिन्यांपूर्वी हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस निराशेकडे जात चालला आहे”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

वाझे प्रकरणात राजीनामे होतील, अटकही होईल पण…!

“सचिन वाझे प्रकरणात राजीनामे होतील, चौकशी होईल, कदाचित अटकही होईल. पण त्यामुळे प्रश्न सुटणार नाहीत. अशा संघटीत गुन्हेगारीला मोक्का कायदा लागतो. त्यामुळे आमची मागणी आहे की, याप्रकरणात पुरावे समोर आल्यास संबंधितांना मोक्का कायदा लावावा”, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#SushantSinghRajput | CBI कडून ६ आरोपींसह अन्य संबंधितांवर गुन्हा दाखल

News Desk

त्रिपुराच्या राज्यपालांची अति घाई, मृत्यूपूर्वीच वाजपेयींना वाहिली श्रद्धांजली

News Desk

वर्षभराचे ३० टक्के वेतन पंतप्रधान निधीला देण्याची राज्यपालांची घोषणा

News Desk