HW News Marathi
महाराष्ट्र

संकटात आम्ही मजबुतीने एकत्र उभे राहिलो | जयंत पाटील

मुंबई | “२१ वर्षात राष्ट्रवादी पार्टीवर अनेक संकटे आलेली पाहिली आहेत. मात्र मजबुतीने आम्ही एकत्र राहिलो आहोत. मागील ५ वर्षात आम्ही आमच्या अडचणींमुळे सत्तेत जात असल्याचे काही लोक सांगून पक्ष सोडून भाजपमध्ये गेले. मात्र आमचाच पक्ष आज सत्तेत आला आहे”, अशी आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी करुन दिली आहे. मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी आज (२५ मार्च) आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी जयंत पाटील बोलत होते.

“बर्‍याच दिवसापासून आपली वाट पहात होतो. कॉंग्रेसला आम्ही याची कल्पना दिली आहे”, असे म्हणत जयंत पाटील यांनी आसिफ शेख यांचे पक्षात स्वागत केले. “कोरोना काळात मालेगावमधील सर्वांना आसिफ शेख यांनी विश्वासात घेऊन प्रवेश घेतला आहे. मालेगावमधील लोकांना शरद पवारांच्या कामावर विश्वास आहे. मालेगाव नगरपालिकेत ज्या समस्या आहेत त्याची कल्पना आम्हाला दिली आहे”, असेही जयंत पाटील म्हणाले. दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते.

आसिफ शेख यांच्या पक्षप्रवेशदरम्यान बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि, “आसिफ शेख यांच्या काही अडचणी होत्या. त्यांनी आमच्याशी चर्चा केली. पिढ्यानपिढ्या काम करणाऱ्या लोकांची राष्ट्रवादीशी नाळ जोडलेली आहे. आसिफ शेख यांनी राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतला आहे तो चांगला आहे. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आमच्याकडे प्रस्ताव दिला आहे”, असेही अजित पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात ‘म्हाडा’तर्फे येत्या आर्थिक वर्षात १२७२४ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित

Aprna

बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत रणजितसिंह देशमुख यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश 

News Desk

निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन

News Desk