HW News Marathi
महाराष्ट्र

मुरुडमध्ये भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले

रायगड | मुरुडच्या नांदगाव येथे भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर लँडिंग करताना समुद्र किनारी कोसळले. या हेलिकॉप्टरमधून ४ जण प्रवास करत होते. एक महिला पायलट गंभीर जखमी झाली असून इतर प्रवाशांना किरकोळ जखमी झाले आहेत.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. हे हेलिकॉप्टर गस्तीपथकाचे असून नेहमी प्रमाणे ते गस्तीसाठी निघाले असताना हा अपघात झाला.

घटनास्थळी तटरक्षक दलाचे विशेष पथक या ठिकाणी दाखल झाले आहे. हा अपघात कशामुळे झाला, यांची माहिती अत्यापही मिळाली नाही. या चारही जणांना विमानाने मुंबईतील नौदलाच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विठूरायाला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चंदनाचा लेप

News Desk

मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली

News Desk

सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली 

News Desk
महाराष्ट्र

एकनाथ खडसे आणि नारायण राणे यांची केंद्रात वर्णी

News Desk

नवी दिल्ली | नारायण राणे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष्याची स्थापना केली. त्यानंतर ते एनडीएत सामील झाले. राणे हे गेल्या अनेक दिवसापासून राज्याच्या राजकारणात सक्रीय होण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत. यासाठी राणेंनी दिल्लीत जावून भाजपचे अध्यक्ष आमित शहा यांची भेट देखील घेतली. या भेटीनंतर राणेंना केंद्रात पाठविण्यात येणार असल्याचे चर्चाला उधान आले आहे.

तसेच गैरव्यवहाराच्या आरोपामुळे एकनाथ खडसे यांना महसूलमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर खडसे सुद्धा राजकारणापासून काही काळ लांब राहिले होते. पण, पक्ष्याकडून त्यांना केंद्रात पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

येत्या २३ मार्चला राज्यसभेच्या ५८ जागांसाठी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात राज्यसभेसाठी ६ जागावर निवडणुका होणार आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातून भाजपचे ३ उमेदवार राज्यसभेत पाठवण्यात येणार आहे. भाजपच्या वतीने दोन जांगेवर नारायण राणे आणि एकनाथ खडसे यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाला असल्याचे कळत आहे. आता एका जाग्यांवर भाजपमधील कोणत्या नेत्याची वर्णी लागणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

Related posts

‘त्या’ शेतकऱ्यांनी आणलेला भाजीपाला विकत घेऊन धनंजय मुंडेंनी दिला दिलासा

News Desk

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम दोन वर्षात पूर्ण करणे शक्य !

swarit

तारापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरात तोडफोड

News Desk