HW News Marathi
महाराष्ट्र

अनेक वादग्रस्त विधानांमुळे इंदुरीकर महाराज मोठ्या अडचणीत

अदमदनगर | कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असतात. समाज प्रबोधन करताना अनेक ज्वलंत विषयांवर तेभाष्य करतात. त्यांच्या अनेक विधानांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केले आहे. सध्या त्यांच्या कीर्तनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या व्हिडिओत त्यांनी शिक्षकांवर भाष्य केले आहे. दरम्यान, त्यांच्या या विधानांमुळे शिक्षक संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे.

शाळेतील शिक्षक हे ३४ मिनीटांच्या तासिकेत वर्गात प्रवेश करायलाच ५ मिनीटे घेतात त्यानंतर फळा पुसायला ५ मिनीटे आणि आदल्या दिवसाच्या तासिकेत काय झाले याच्या स्पष्टीकरणासाठी ५ मिनीटे. ही पाच मिनीटांची मालिका इथेच न संपता उद्या काय शिकवणार हेही सांगायला ५ मिनीटे, आणि मग तास संपतो. अशा आशयात त्यांनी शिक्षकांवर उडवलेल्या खिल्लीमुळे शिक्षक संघटना संतापल्या आहेत. काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराजांनी ओझर येथे झालेल्या कीर्तनात मुला-मुलींच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते आणि आता पुन्हा एकदा शिक्षकांसंदर्भातही त्यांनी विधान केले आहे. अनेक महत्त्वाच्या बाबी आणि कठीण गोष्टी या कीर्तनातून जनमांसांपर्यंत पोहोचवता य़ेतात पण त्या सांगत असताना आपली शोभा होणार नाही याची काळजी घ्यावी अशा शब्दांत इंदुरीकर महाराजांना शिक्षणतज्ज्ञांनी टोला लगावला आहे.

इतक्या वादग्रस्त विधानानंतर या सगळ्याची सारवासारव करण्यासाठी इंदुरीकर महाराजांनी एक स्पष्टीकरण दिले आहे. ‘यूट्यूबवाले आणि कॅमेरावाले माझ्या मागे लागलेत. इंदुरीकर संपवायला निघालेत. मी कशात सापडेना म्हणून मला गुंतवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी आता एका वेगळ्या निर्णयाप्रत आलोय. एखाद-दुसरा दिवस जाऊ द्यायचा. आता लय झालं. फेटा ठेवून द्यायचा. आपली सहन करायची कॅपॅसिटी संपली,’ असं त्यांनी सांगताच उपस्थित चकित झाले.

‘२६ वर्षे झाली. मला बायको नाही. पोरगं नाही. रात्रं-दिवस प्रवास, कष्ट, कष्ट, कष्ट, कष्ट… लोकांसाठी करायचं. दोन-अडीच तासाच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतो. पण मी बोललेलो वाक्य चुकीचं नाही. ही यूट्यूबवाली मंडळी झाली कोट्यधीश. प्रत्येक व्हिडिओला एक एक लाख लाइक आहेत. पैसाच मोजता येईना, इतका पैसा झालाय. पाहणाऱ्यांची संख्या खूप असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पण इतके होऊनही ते आता वादग्रस्त विधाने करणे थांबवणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट शिजलेल्या बैठकीला सचिन वाझे होते हजर”, NIAने दिली माहिती

News Desk

लसीकरण मोहीम आणि मुख्यमंत्र्यांच्या संवाद शैलीवर अतुल भातखळकरांची खोचक टीका

News Desk

पराभवाची चर्चा करण्यापेक्षा विधानसभेची तयारी करा !

News Desk