HW News Marathi
महाराष्ट्र

बिहारमधून आलेल्या अधिकाऱ्यांना गृह अलगीकरणात ठेवल्याच्या बातम्यांबाबत वस्तुस्थिती

मुंबई | बिहारमधून मुंबईतील गोरेगांवमध्ये आलेल्या पोलीस अधिकाऱयांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने अलगीकरण (क्वारंटाईन) केले, या आशयाच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून प्रसारित होत आहेत. यासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडून वस्तुस्थितीदर्शक माहिती पुढीलप्रमाणे देण्यात येत आहे.
बिहार राज्यातून आलेले पोलीस अधिकारी मुंबईतील गोरेगांव (पूर्व) मधील राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ) ग्रुप ८ विश्रामगृहात मुक्कामी आले असल्याची माहिती महानगरपालिकेच्या पी/दक्षिण विभाग कार्यालयाकडे प्राप्त झाली. ते देशांतर्गत प्रवासी असल्याने, त्यांना कोविड १९ संदर्भातील राज्य शासनाच्या नियमावलीनुसार गृह अलगीकरण (होम क्वारंटाइन) करणे आवश्यक असल्याने महानगरपालिकेचे पथक काल (दिनांक २ ऑगस्ट २०२०) सायंकाळी सदर विश्रामगृहावर पोहोचले.
महानगरपालिकेच्या पथकाने, बिहार येथून आलेल्या या अधिकाऱयांना देशांतर्गत प्रवास करणाऱया व्यक्तिंसाठी लागू असलेली गृह अलगीकरण (होम क्वारंटाइन) बाबतची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. राज्य शासनाचे दिनांक २५ मे २०२० रोजीचे आदेश क्रमांक डिएमयू/२०२०/सीआर ९२/डिएसएम १ अन्वये देशांतर्गत विमान प्रवास करणाऱया व्‍यक्तिंसाठी नियमावली ठरवून देण्यात आली असून त्यामध्ये गृह अलगीकरणाचा देखील समावेश आहे, त्याची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली.
त्यासोबतच, त्यांना माहिती देण्यात आली की, राज्य शासनाच्या नियमावलीनुसार, गृह अलगीकरणातून सूट मिळण्यासाठी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सक्षम प्राधिकारी यांच्याकडे नियमावलीनुसार अर्ज करणे आवश्यक आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sheena Bora Case : साडेसहा वर्षापासून तुरुंगात असलेली इंद्राणी मुखर्जी अखेर बाहेर

Aprna

संजय राऊतांकडून इंदिरा गांधींबाबतचे ‘ते’ विधान मागे

News Desk

पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश, आपत्कालीन मदत यंत्रणेचे मानले आभार

News Desk