HW News Marathi
महाराष्ट्र

गृह विभागाकधून सौरभ त्रिपाठींच्या निलंबनाचे आदेश

मुंबई – मुंबईतील अंगडिया व्यापाऱ्यांकडून झालेल्या कथित वसुलीप्रकरणी आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्या निलंबिनाचे आदेश देण्यात आले आहेत. त्रिपाठी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव महाराष्ट्राच्या गृहखात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला होता, त्यावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी केली होती. आता गृह विभागाकाढून शासन निर्णय काडत यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांनी या वसुली प्रकरणाची माहिती गृहमंत्रालयाला दिली होती. त्रिपाठी यांच्या विरोधात भक्कम पुरावे सापडले असून त्यांच्यावर विभागीय कारवाई करावी, हेही स्पष्ट केले होते. तक्रारदाराला फोन करून तक्रार मागे घेण्यास सांगितल्याचा आरोपही त्रिपाठी यांच्यावर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई पोलिसात कार्यरत आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्यावर खंडणीचा आरोप झाल्यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार लटकू लागली होती. त्यानंतर त्यांनी अटकेपासून बचाव करण्यासाठी सेशन्स कोर्टात धाव घेतली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिपाठी यांनी आपल्या अटकपूर्व जामीन अर्जात असे म्हंटले होते की यापूर्वीच्या एफआयआरमध्ये त्यांच नाव नव्हते आणि पोलिस ठाण्याच्या पातळीवर अंगडियाकडून पैसे वसूल केले जात होते याची त्यांना माहिती नव्हती. त्रिपाठी यांच्या याचिकेवर आता 23 तारखेला कोर्टात सुनावणी होणार असून त्यानंतर त्रिपाठी यांना अटकेपासून दिलासा द्यायचा की नाही, याचा निर्णय कोर्ट घेऊ शकतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रिलायन्सकडून मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता निधीत ५ कोटींची मदत

swarit

आजपासून बेस्टचे किमान प्रवास भाडे फक्त ५ रुपये

News Desk

ST कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे! – उच्च न्यायालय

Aprna