HW News Marathi
महाराष्ट्र

सिंचनासाठी महाराष्ट्राला १ लाख १५ हजार कोटींची मदत | नितीन गडकरी

नवी दिल्ली | राज्यातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी तसेच रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्राने महाराष्ट्रासाठी १ लाख १५ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा बुधवारी झाली आहे. हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बळीराजा संजीवनी योजने अंतर्गत केंद्राकडून ही मदत दिली जाणार आहे. यामुळे राज्याच्या सिंचन क्षमतेत २२ टक्क्यांनी वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.

गडकरी म्हणाले, पावसाळा संपताच सिंचन प्रकल्पाला सुरुवात होईल. राज्यातील ९१ प्रकल्पांसाठी केंद्राची ही महत्वाकांक्षी योजना असून त्यामुळे राज्याची सिंचनासाठी मोठी मदत होणार आहे. सिंचन क्षमतेतही यामुळे वाढ होणार असून सिंचन १८ टक्क्यांवरुन ४० टक्क्यांवर जाणार आहे. तसेच या प्रकल्पात सातारा, सांगली आणि बुलढाण्यातील प्रकल्पांचा समावेश असल्याची माहिती गडकरीनी दिली. केंद्राच्या मदतीमुळे सिंचनक्षेत्र 40 टक्के वाढेल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोकूळचा हा विजय जिल्ह्यातल्या सर्वसामान्य दूध उत्पादकांचा ! सतेज पाटलांनी मानले आभार

News Desk

“काँग्रेसशिवाय सरकार आहे अशी शंका नाना पटोले यांना का यावी?”, राऊतांचा सवाल

News Desk

कंगना राणावतला ट्विटरनंतर आता इन्स्टाग्रामचाही दणका, ‘कोरोना पार्टी’ पडली महागात

News Desk