HW News Marathi
महाराष्ट्र

औरंगाबादचे शिवसेनेवरचे प्रेम आटले का ?

औरंगाबाद | “औरंगाबादमध्ये भगवा मागे कसा पडला ? औरंगाबादचे शिवसेनेवरचे प्रेम आटले का ?”, असा भावनिक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या औरंगाबाद मतदारसंघात यंदा मात्र शिवसेनेला मोठा धक्का सहन करावा लागला. औरंगाबाद मतदारसंघातून सलग ४ वेळा लोकसभेवर निवडून गेलेले शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज (२२ जून) नाशिक आणि औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीही याबाबतची खंत उघडपणे व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी ९ मे रोजी जालना जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यात असताना देखील याबाबत खंत व्यक्त केली होती. “चंद्रकांत खैरे यांचा पराभव हा माझा पराभव आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तर स्वतः चंद्रकांत खैरे यांनी देखील “मी निवडणुकीपूर्वीच हार्ट अटॅक येऊन मेलो का नाही”, असे भावनिक वक्तव्य केले होते. खैरे यांना यंदा पत्करावा लागलेला पराभव हा नक्कीच शिवसेनेला अनपेक्षित होता. खैरे यांना त्यांच्या ३१ वर्षांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“दैनिक सामनाचा राऊतांकडून स्वत:च्या फायद्यासाठी गैरवापर होतोय”, चित्र वाघांचं प्रत्युत्तर

News Desk

CBSE कडून १०वी-१२वीच्या वेळापत्रकात बदल

News Desk

‘व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाये संविधान’,वडूजमध्ये अभियानाची सांगता ! 

News Desk