HW News Marathi
महाराष्ट्र

“तुमची घाणेरडी प्रकरणं बाहेर येतात म्हणून राज्यात कोरोना वाढतोय का?”

मुंबई । राज्यासह देशभरात वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकड्यामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊनची वेळ येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून या पार्श्वभूमीवर काही निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. याचवरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महाविकासआघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. “महाराष्ट्राला लागून असलेल्या गोवा, कर्नाटक आणि गुजरात या राज्यात कोरोना नाही, फक्त महाराष्ट्रातच कोरोना कसा वाढतोय ? तुमची घाणेरडी प्रकरणं बाहेर येतात म्हणून राज्यात कोरोना वाढतोय का?”, अशी अत्यंत बोचरी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महाविकासआघाडी सरकारवर केली आहे.

“राज्य सरकारकडून कोरोनाचा बाऊ केला जात आहे”, अशीही टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे. महाविकासआघाडी सरकारवर गंभीर आरोप करत काही सवाल उपस्थित करताना संदीप देशपांडे म्हणतात कि, “तुमची घाणेरडी प्रकरण बाहेर येतात म्हणून कोरोना वाढतोय का? महाराष्ट्राला लागून असलेल्या राज्यात कोरोना नाही, फक्त महाराष्ट्रातच तो कसा वाढतोय? सरकारचे कोरोनावर किंवा कोरोनाचं सरकारवर प्रेम आहे ?” पुढे राज्य सरकारने लावलेल्या कडक निर्बंधांबाबत बोलताना संदीप देशपांडे विचारतात कि, ” राज्य सरकार जर एवढे जर कडक निर्बंध लावत असेल तर जनतेला काही सवलती देणार का?”

राज्यात खळबळ उडवणाऱ्या पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणावर देखील संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सचिन वाझे प्रकरणी बोलताना संदीप देशपांडे म्हणतात कि, “या प्रकरणामुळे मुंबई नव्हे तर महाराष्ट्र पोलिसांच्या विश्वासाहर्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. पोलीस महाराष्ट्र सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत. सरकाराला प्रश्न विचारणाऱ्यावर पोलीस कारवाई करणार. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून पूर्ण सत्य बाहेर येणे आवश्यक आहे”, असे संदीप देशपांडे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपविरोधातील प्रत्येक आवाज दाबण्यासाठी ED सारख्या यंत्रणांचा गैरवापर! – नाना पटोले

Aprna

राज्यातील ४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा – बाळासाहेब थोरात

News Desk

मंत्रालय सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Aprna