HW News Marathi
महाराष्ट्र

“आम्ही तिरंगा हातात घेणं गुन्हा आहे का?” – असदुद्दीन ओवैसी

मुंबई | राज्यभरातून निघालेल्या एमआयएमच्या तिरंगा रॅलीचा अखेर समारोप झाला आहे. औरंगाबादहून खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात निघालेली ही रॅली शनिवारी (११ डिसेंबर) मुंबईत पोहोचली आहे. दरम्यान, या रॅलीच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर मुंबईत १४४ कलम लागू करण्यात आलं होतं. त्यावरून “आमच्या रॅलीसाठी कलम १४४ लावता? मग आता राहुल गांधी मुंबईत येतील तेव्हाही कलम १४४ लागू होणार का?”, असा सवाल उपस्थित करत एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसींनी संताप व्यक्त केला आहे. “आम्ही तिरंगा हातात घेणं गुन्हा आहे का?”, असा सवालही ओवैसींनी यावेळी केला आहे.

चांदिवलीत बोलताना ठाकरे सरकारवर टीका करत असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, “आज आमची रॅली आहे म्हटल्यावर मुंबईत कलम १४४ लागू केलं गेलं? आता राहुल गांधी मुंबईत येतील तेव्हाही कलम १४४ लागू होणार की त्यांचं फुलांनी स्वागत करणार?” यावेळी ओवैसींनी शिवसेनेवरही जोरदार निशाणा साधला आहे. “शिवसेनेला तिरंग्याचं एवढं वावडं का?”, असा सवाल यावेळी ओवैसींनी उपस्थित केला आहे. “आम्ही तिरंगा हातात घेणं गुन्हा आहे का? मुस्लिमांचा विरोध, एमआयएमचा विरोध समजू शकतो. पण तिरंग्याचा विरोध का?”, असा सवाल ओवैसींनी केलाय.

उद्धव ठाकरे धर्मनिरपेक्ष आहेत का?

“एमआयएमला मतदान करू नका असं हे लोक तुम्हाला सांगत आहेत. एमआयएम मतांची विभागणी करेल अशी भीती तुम्हाला दाखवली जात आहे. मात्र, आता तेच जातीयवाद्यांसोबत बसून सत्ता उपभोगत आहेत. आता आमच्यामुळे जर मत विभागणी होत असेल तर मग उद्धव ठाकरे हे धर्मनिरपेक्ष आहेत का?”, असा सवाल ओवैसींनी उपस्थित केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईला अतिवृष्टीचा इशारा! मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

News Desk

“किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार!”

News Desk

राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भररस्त्यात मंत्रालयबाहेर अंधारातच भरवला जनता दरबार..

News Desk