HW News Marathi
महाराष्ट्र

“हे काही रामराज्य आहे का?,” संजय राऊत मोदी सरकारवर संतापले

नवी दिल्ली। लखीमपूर खेरी इथल्या घटनेबद्दल सध्या जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. तसंच माफीची मागणीही त्यांनी केली आहे. प्रियंका गांधींना ताब्यात घेतल्याचाही त्यांनी निषेध केला आहे.यावेळी प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले, प्रियांका गांधी यांच्याशी तुमचं राजकीय वैर असू शकतं, काँग्रेसशी असू शकतं, पण त्यांचा गुन्हा काय आहे की कोणत्याही वॉरंटशिवाय तिथे ताब्यात घेतलं? त्या इंदिरा गांधी यांची नात आहे, त्या महिला आहेत. ज्या पद्धतीने पोलिस प्रियांका गांधी यांच्याशी वागले ते आदेशच होते.

लखीमपूर खेरी इथं झालेल्या संघर्षाबद्दल बोलताना राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. तसंच मोदी सरकारने शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणीही केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, हे काही रामराज्य आहे का ? तुम्ही माफी मागत आहात का ? शेतकऱ्यांना चिरडण्याचा विषय आहे. यावर माफी मगितलीच पाहिजे. देशात अघोषित आणिबाणी सुरू आहे. पण शेतकरी, जनता लढत राहतील.

भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकतो

काँग्रेसचे खासदार उदित राज यांनी याबाबतचं एक ट्विट केलं आहे. “असं दिसतंय की जणू केंद्र सरकारने फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम जाणीवपूर्वक बंद केलं आहे. प्रियांका गांधीजींची चळवळ दडपली जाईल, यासाठी हे करण्यात आलं”, असा दावा उदित राज यांनी केला आहे. तर, आम आदमी पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी देखील अशीच प्रतिक्रिया दिली आहे. “भाजप मंत्र्याच्या दुष्कर्माचा व्हिडिओ आल्यापासून फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅप बंद झाले आहेत. भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकतो”, असं सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचार प्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याबाबत सोमवारी दिवसभरात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा आरोप केला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

एमएचटी सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर, ‘या’ दिवशी परीक्षेला सुरुवात, उदय सामंतांची घोषणा!

News Desk

राज्यात ५०० आदर्श शाळा स्थापित करणार – वर्षा गायकवाड

News Desk

भावना गवळींचे दोन्ही सहकारी ईडीसमोर गैरहजर!

News Desk