HW News Marathi
महाराष्ट्र

रेल्वे अपघात रोखण्यासाठी घेणार जपानची मदत

मुंबई : अपघातांचे सत्र थांबविण्यात रेल्वे प्रशासनाला अपयश आल्याने, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारताने जपानची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. जपानमधील रेल्वे सुरक्षा तज्ज्ञांचे पथक भारत दौऱ्यावर आले असून रेल्वे मंत्रालयातील अधिकारी आणि रेल्वे सुरक्षा तज्ज्ञांशी हे पथक चर्चा करणार आहे.

रेल्वे सुरक्षा तज्ज्ञांचे पथक पाठवावे, अशी विनंती जुलै महिन्यात भारताने जपानला केली होती. हे पथक पाच दिवसांसाठी भारतात आले असून जपानच्या दूतावासाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती देण्यात आली.

या पथकामध्ये रेल्वेशी संबंधित संस्था, जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी (जेआयसीए) आणि जपान सरकारच्या पायाभूत सुविधा, वाहतूक, पर्यटन मंत्रालयातील सुरक्षा तज्ज्ञांचा समावेश आहे. हे तज्ज्ञ भारतातील सध्याच्या रेल्वे सुरक्षेचा आढावा घेण्यात येणार आहे. यानंतर संबंधित तज्ज्ञांकडून जेआयसीए आणि भारतीय रेल्वे मंत्रालय यांच्या माध्यमातून सुरक्षेसाठी आणखी काय उपाय करण्यात येतील, यावर चर्चा करण्यात येईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुंबईचे डबेवाले” शक्ती आणि भक्तीचे प्रतीक! आदित्य ठाकरे

Aprna

MPSCExam : विद्यार्थ्यांवर रस्त्यावर उतरण्याची वेळ नाही आली पाहिजे, अजित पवारांनी व्यक्त केली खंत

News Desk

“अजितदादा, जयंत पाटील, मुनगंटीवार, विखे-पाटील आणि मला चित्रपटात भूमिका द्या”- गिरीश महाजन

News Desk