HW News Marathi
Covid-19

जयंत पाटील पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये, १४ दिवसांच्या क्वॉरंटाईन काळानंतर कामकाजाला केली सुरुवात

मुंबई | राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आणि सामान्य नागरिकांसोबत नेत्यांनाही कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनाही करोनाची लागण झाली होती. आणि आता जयंत पाटील कोरोनातून बरे झाले आहेत. तब्बल १५ दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केली असून कामकाजाला सुरुवातही केली आहे.

जयंत पाटील यांनी काल ट्विट करून ते कोरोनातून मुक्त झाल्याचं स्पष्ट केलं आहे. १४ दिवसांचा क्वॉरंटाईन काळ पूर्ण करत राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होणार आहे. या काळात मुंबई महापालिका आणि इतर शासकीय यंत्रणेने वेळोवेळी केलेल्या सहकार्याबाबत मी आभारी आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये, चाचण्या करून घ्याव्यात. योग्य औषधोपचार घेऊन आपण कोरोनावर मात करू शकतो, असं पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्यात आज १०,४८३ नवे रुग्ण आढळले

News Desk

ज्येष्ठ साहित्यिक, रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांचे निधन

News Desk

पालघर मॉब लिंचिंगप्रकरणी आणखी पाचजण अटकेत, सर्व आरोपींची १३ मेपर्यंत सीआयडी कोठडी

News Desk