HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप जाणुनबुजून स्वत:च्या सोयीची वातावरणनिर्मिती करत आहे, ठाकरे- मुनगंटीवार भेटीवर राष्ट्रवादीचे उत्तर

वर्धा | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यातील बहुचर्चित भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाष्य करण्यात आले आहे. भाजपला शिवसेनेशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. त्यामुळेच भविष्यात कधीतरी शिवसेना पुन्हा आपल्यासोबत येईल, अशी आशा भाजपच्या मनात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

आज (३ फेब्रुवारी) वर्ध्यात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप जाणुनबुजून स्वत:च्या सोयीची वातावरणनिर्मिती करून पाहत असल्याचा आरोप केला आहे. भाजपला निराशेने ग्रासले आहे. शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय त्यांना दिसत नाही. त्यामुळे स्वत:च्या मतदारसंघाच्या कामाचे कारण पुढे करून भाजपचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. या भेटीतून वेगळे अर्थ काढून चर्चा घडवून आणायची आणि त्या माध्यमातून होणाऱ्या राजकीय वातावरणनिर्मितीचा फायदा उठवायचा, हा भाजपचा डाव असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सरकार पाडून दाखवा? अहो जराशीपण लाज असेल तर सरकार चालवून दाखवा ना!

News Desk

“उदय सामंत, शंकरराव गडाख, अब्दुल सत्तार हे १९६६ पासूनचे शिवसैनिक आहेत काय?”

News Desk

परमबीर सिंग यांची सर्वोच्च न्यायालयात धाव,काय तक्रार केली ?

News Desk