HW News Marathi
महाराष्ट्र

कृष्णा उपखोऱ्यातील गावे पुराच्या दृष्टीने संवेदनशील

मुंबई | कृष्णा उपखोऱ्यातील सांगली, कोल्हापूर ही दोन शहरे व नदीकाठची गावे पुराच्या दृष्टीने संवेदनशील आहेत. मागील दोन दिवसांपासून या भागात प्रचंड पाऊस होत आहे. आणखी दोन दिवस पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

कोयना धरणातून ३५००० क्युसेक्स व इतर धरणातून ८००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. मात्र पाऊस जास्त असल्याने पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. कृष्णेची पाणीपातळी सध्या २९ फुट आहे मात्र ती संध्याकाळपर्यंत ३८ ते ४० फुट इतकी होऊ शकते असा अंदाज पाटील यांनी व्यक्त केला आहे.

या पार्श्वभूमीवर सांगली शहर व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन व पूर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. कोल्हापूर शहर व परिसरातील भागांना सध्या धोका नाही, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

भिमा खोऱ्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. मागील २४ तासात येथे १०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्यात सामान्य स्थिती आहे मात्र निरा, नरसिंहपूर व सोलापूर जिल्ह्यातील काही गावांना तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

उजनी धरणामधून रात्री ११.३० ते पहाटे ५ यादरम्यान २५०००० क्युसेक्स ने पाणी सोडण्यात आले होते. सद्यस्थितीत उजनी धरणातून १४०००० क्युसेक्स ने पाणी सोडण्यात आलेले आहे. निरा-नरसिंहपुर या ठिकाणी सकाळी ९ वाजता ३१२००० क्युसेक्स इतका विसर्ग होता, या ठिकाणी सद्यस्थितीत दुपारी २ वाजता २७५००० क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. सर्व नागरिकांना प्रशासनामार्फत सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंढरपूर येथील नागरिकांनी विशेषतः खबरदारी घेण्याची विनंती देखील जयंत पाटील यांनी नागरिकांना केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी मोदी सरकारकडून घसघशीत मदत केली – देवेंद्र फडणवीस

News Desk

अदार पुनावला यांना शिवसेनेच्या गुंडांनी धमकी दिली ? नेमकं काय आहे सत्य ?

News Desk

शरद पवारांच्या बेळगाव दौऱ्याच्या आठवणीवरून सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर निशाणा

Aprna