HW News Marathi
महाराष्ट्र

…तर रेमिडिसिव्हीरसाठी आम्ही सुजय विखेंचाच नंबर दिला असता ! जयंत पाटलांचा टोला

पुणे | भाजपचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी अहमदनगरकरांसाठी थेट दिल्लीहून रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा आणला होता. मात्र, यामुळे ते अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. औरंगाबाद कोर्टात त्यांच्याविरोधात याचिका ३ जणांनी दाखल केली आहे. यावरुनच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (२७ एप्रिल) पुण्यात पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे. “आम्हाला आधी कळालं असतं तर रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी आम्ही रुग्णालयांना सुजय विखे-पाटील यांचाच नंबर दिला असता, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

“हा प्रकार अतिश्य गंभीर आहे. औरंगाबाद उच्च न्यायालायने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. लोकप्रतिनिधी इंजेक्शन्स घेऊन बसायला लागले आणि त्यांचे वाटप करत असतील तर वैद्यकीय यंत्रणांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळण्यात अडथळे येतील”, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

यावेळी त्यांनी सुजय विखे-पाटील यांच्याकडून करण्यात आलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वादग्रस्त खरेदीवर भाष्य करण्यात आले. आम्हाला आधी कळलं असतं तर आम्ही रेमडेविसिरची गरज असलेले रुग्ण आणि डॉक्टरांना सुजय विखेंचा नंबर दिला असता. मात्र, अशाप्रकारे राजकीय हेतूने काम करणे योग्य नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

सुजय विखे पाटील काय म्हणाले?

दिल्लीतून नगर जिल्ह्यासाठी परस्पर रेमडेसिवीर इंजेक्शन घेऊन आल्यामुळे वादाच्या आणि आरोपांच्या कचाट्याक सापडलेले भाजप खासदार सुजय विखे-पाटील आता प्रतिस्पर्ध्यांविरोधात दंड थोपटून उभे राहिले आहेत. या संपूर्ण प्रकरणात मी नगर जिल्ह्याबाहेरील कोणत्याही व्यक्तीला उत्तर देण्यास बांधील नाही. जनतेने निवडून दिलेल्यामुळे नगरमधील कोणत्याही लोकप्रतिनिधीने मला प्रश्न विचारला तर मी त्यांना सर्व पुरावे देईन, असे सुजय विखे-पाटील यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी ‘आयएफसी’ सोबतचा भागिदारी करार उपयुक्त ठरेल! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

औरंगाबादेतील सिल्लोड जळीतकांडामधील पीडित महिलेचा मृत्यू

swarit

मुंबई उच्च न्यायालयाकडून किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

Aprna