HW News Marathi
देश / विदेश

तिथे मॅप बदलले जात आहेत, आणि आपण इथे ॲप वर बंदी घालतोय

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून चीन आणि भारतात वाद सुरू आहे. भारत आणि चीनच्या सैन्यात पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत २० जवान शहीद झाले. त्यानंतर देशात चीन विरुद्ध वातावरण निर्माण झाले आणि हळू हळू चीनी वस्तूंवर बंदी घालण्यास सुरुवात झाली.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ॲप्सवर बंदी घालणे हा पोरकटपणा आहे. तिथे मॅप बदलले जात आहेत, आणि आपण इथे ॲप वर बंदी घालतोय. काय पोरकटपणा आहे! कारण आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सदस्य आहोत आणि आपण स्वाक्षरी केलेल्या कराराच्या कलम २ आणि १४ (सी) – २ या कलमांनुसार ही बंदी शक्य आहे का ? कशाला ही धूळफेक? असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमित शहांची संपत्ती ३०० टक्यांनी वाढली

News Desk

#PulwamaAttack : दहशतवाद्यांनी आपले तळ पाकिस्तानी लष्कराच्या जवळ नेले

News Desk

युक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागून जखमी, रुग्णालयात उपचार सुरू; व्हीके सिंग यांची माहिती

Aprna