HW News Marathi
महाराष्ट्र

आजी मंत्र्यांच्याही सुरक्षेत वाढ करा !

मुंबई | महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांनी आपल्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत ही मागणी केली आहे. काल (५ फेब्रुवारी) राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी सुरक्षा वाढवण्याची मागणी करत, सरकार माजी मंत्र्यांना सुरक्षा पुरवते, मग आजी मंत्र्यांना आवश्यक सुरक्षा हवी, अशा शब्दांत मागणी केली.

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानंतर आपल्या घराचीही रेकी करण्यात आली होती. मात्र भाजपाने आवश्यक ती सुरक्षा न पुरवल्याने माझ्या जीवाला धोका असल्याने सुरक्षा वाढवावी असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचा वाढता धोका पाहता, सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

मंत्रिमंडळात झालेल्या या बैठकीत हिंगणघाट जळीतकांडसह इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा झाली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या सुरक्षेबाबतचा मुद्दा उपस्थित करत, “मागील सरकारने त्यांची सुरक्षाव्यवस्था कमी केली होती. तसेच दाभोळकर आणि पानसरे यांच्या हत्येनंतर काही संघटनांनी त्यांच्या घराचीही पाहणी केल्याचे पुरावे समोर आले होते. त्यामुळे काही कट्टर संघटनांचे हेतू लक्षात घेता आपली सुरक्षा वाढवावी.” हा सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनीही आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत सुरक्षा वाढवण्याची मागणी केली. दरम्यान, जितेंद्र आव्हाड आणि विजय वडेट्टीवार यांच्या सुरक्षा वाढवण्याच्या मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भुमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘…चक्क पुण्याचे शिल्पकार, यापेक्षा मोठा जोक असूच शकत नाही”, मिटकरींनी डिवचले

News Desk

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अखेर श्रीनिवास रेड्डीला अटक

News Desk

नांदेड जिल्हा बॅंक निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय ! पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणतात..

News Desk