HW News Marathi
Covid-19

मी केलेल्या चुका तुम्ही करु नका, जितेंद्र आव्हाड

मुंबई | राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड कोरोनावर मात करुन यशस्वीपणे घरी परतले आहेत. २३ एप्रिलला जितेंद्र आव्हाड रुग्णालयात दाखल झाले होते. आणि त्यानंतर घरी परतल्यानंतर त्यांनी काही बाबी सांगितल्या आहेत. त्यांनी हे ही सांगितले की मी ज्या चूका केल्या त्या तूम्ही करु नका. सुरुवातीला जेव्हा माझा पहिला रिपोर्ट निगोटिव्ह आल्यानंतर मी दुर्लक्ष केले, आणि त्यानंतर काही दिवसांनी मला ताप आला आहणि मग माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याची किंमत म्हणून मला कोरोनाचा सामना करावा लागला.

त्यामूळे मी पहिल्यांदा दुर्लक्ष केल्याने मला त्याची मोठी किंमत मोजावी लागली, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. आणि तुम्ही कोणीही कोरोना सदृष्य लक्षणे जर दिसली तर लगेचच डॉक्टरांकडे जा, दुर्लक्ष करु नका असा सल्लाही यावेळा त्यांनी दिला. तसेच, या कठीण काळात मला अनेकांनी साथ दिली, घरच्यांनी, डॉक्टरांनी मला बरे करण्यासाठी जे प्रयत्न केले त्या सगळ्यांचे आभार मानले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मॉल्स वगळता इतर दुकानांना लॉकडाऊनमधून सूट, केंद्राचा मोठा निर्णय

News Desk

महाराष्ट्रातील निर्बंध शिथील होणार नाहीत ! बैठकीत तशी चर्चा नाही- राजेश टोपे

News Desk

कोरोनाच्या काळात राजकरण नको!

News Desk