HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे मराठी भय्ये माफी मागणार का?

मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूतची हत्या झाली नसून ती आत्महत्याच असल्याचे एम्सच्या अहवालातून सिद्ध झाले आहे. या अहवालानंतर महाराष्ट्र आणि मुंबईवर टीका करणाऱ्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. अभिनेता सुशांतससिंग राजपूत मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे “मराठी भय्ये” माफी मागणार का? असा प्रश्न आव्हाड यांनी विचारला आहे.

आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘सुशांत प्रकरणात काही न्यूज चॅनेल्स, मराठी भैय्ये आणि भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी केली. आता सीबीआयने मान्य केलं आहे की, सुशांतने आत्महत्याच केली. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे “मराठी भैय्ये” आता माफी मागणार का?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई पालिकेनं ३९,०३८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला

News Desk

कावळ्याच्या शापाने गुरं मरत नाहीत,अजित पवारांचा निलेश राणेंना सणसणीत टोला!

News Desk

“अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला मधाचे बोट लावण्याचा प्रयत्न”, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

Aprna