HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईला बदनाम करण्याचे कारस्थान आणि खोट्यांचे पितळ उघडं पडलं…

मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूतची हत्या झाली नसून आत्महत्या झाली असल्याचा अहवाल एम्सने दिला आहे. या अहवालानंतर महाराष्ट्र आणि मुंबईवर टीका करणाऱ्यांविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. “मुंबईला बदनाम करण्याचे हे कारस्थान होते, खोट्यांचे पितळ उघड पडलं आहे.” असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी इतरांना बदनाम करण्याचे काम सुशांत सिंह राजपूत प्रकरणात झाले आहे. मुंबई पोलीस, मनपा, मुंबईला बदनाम करण्याचे कारस्थान रचले गेले. मात्र खोट्यांचे पितळ उघडे पडले आहे. व्हिसेरा अहवाल आणि शवविच्छेदन अहवाल एम्स रुग्णालयाने दिला आहे. यामुळे लोकांचा आता मनपावरचा विश्वास वाढला आहे असंही महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. टीव्ही९ या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

यंत्रणांनी काय समोर आणलं ते पाहा. मुंबईला, आदित्य ठाकरेंना, शिवसेनाला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र केले गेले. मात्र आमचा यंत्रणांवर विश्वास आहे, या यंत्रणांचा चुकीचा वापर केला जातो आहे. आरोग्य सेवा, पोलीस सेवा आणि नेत्यांची बदनामी करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी आता निर्णय घ्यावा, त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. मुंबईची आणि शिवसेनेची प्रतिमा मलीन करणाऱ्यांचे हात रिकामेच राहिले आहेत. मुंबईच्या जनतेने समाजमाध्यमातून त्यांना चांगले उत्तर दिले आहे असं म्हणत त्यांनी भाजपाला टोला लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus : कॉर्पोरेट कंपन्यांशी सकारात्मक चर्चा, राज्यात शटडाऊनची गरज, आरोग्यमंत्री

swarit

राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, राऊतांची राज्यपालांवर टीका

News Desk

कर्जमाफी प्रकियेतील आधार कार्डचा घोळ

News Desk