HW News Marathi
Covid-19

लॉकडाऊन वाढणार की संपणार मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

मुंबई | लॉकडाऊन अचानक लावणे जसे चुकीचे आहे, तसेच लॉकडाऊन अचानक काढणे देखील चूक आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी राज्यात चौथ्या टप्प्याचा लॉकडाऊन वाढवल्यानंतर पहिल्या आज (२४ मे) फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “लॉकडाऊन हा शब्द बाजूला ठेवा. हळूहळू काय सुरु करायच याची यादी मी देत जाईन, पण तुम्ही सहकार्य करा. ज्या पद्धतीने हळूहळू लॉकडाऊन घालण्यात आला तसेच हळूहळू लॉकडाऊन उठवण्यात येईल,” असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

कोरोनासोबत जगायला शिका म्हणजे, सोशल डिस्टन्सिंग पाळा, तोंडाला मास्क लावा, रस्त्यावर थुंकू नका, हात वारंवार स्वच्छ ठेवा हे करावे लागणार आहे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आजच्या संबोधणातून दिल्या आहेत. ईद घरातूनच साजरी करा. मुस्लिम बांधवाकडूनही सहकार्य मिळते. आणि पुढील काही दिवस धार्मिक, सामाजिक, सण-उत्सव घरातच साजरे करा, प्रत्येक धर्मातील लोकांनी आपापल्या ईश्वराकडे प्रार्थना करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी सर्वांच केले. मराठवाडा, विदर्भ याच्यासह उत्तर महाराष्ट्र, कोकण अशा ग्रामीण भागातील जनतेनेही चांगले सहकार्य केले आणि कोविडचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवला, असे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले.

रक्तदान करा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

दहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा सध्या राज्या उपलब्ध आहे. त्यामुळे रक्तदान करा. आपण साठा पुरेसा असल्याने थांबवले होते. आता पुन्हा गरज निर्माण झाली आहे. रक्तदान करणाऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पावसात जास्त काळजी घेण्याची गरज आहे. पावसाळ्यात विनाकारण भिजणे शक्यतो टाळा, रोगराई आणि साथी आपल्याला टाळायला हव्या, पाणी उकळून प्या, सर्दी, खोकला दिसल्यात तातडीने डॉक्टरकडे जाण्याची गरज असल्याचेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले आहे. सर्दी, खोकला आणि ताप ही कोरोनाची लक्षण असली तरी वास न येणे, थकवा जाणवणे, वास येत नसल्यास लागलीच डॉक्टरांशी संपर्क साधा. वेळेत रुग्णांवर उपचार सुरू केल्यामुळे ते ठणठणीत होऊन घरी गेले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ही सेवा महाराष्ट्र अन् शिवरायांच्या चरणी रूजू झाल्याशिवाय राहणार नाही !

News Desk

राज्यात आज ६ हजारांहून अधिक ‘कोरोनामुक्त’, रिकव्हरी रेटही ९० टक्क्यांवर

News Desk

देशाचा कोरोना रुग्णांचा आकडा ६२ लाखांच्या पार

News Desk