HW News Marathi
देश / विदेश

कामगार संघटनांचा आज ‘भारत बंद’

मुंबई | देशातील मोठ्या कामगार संघटनांनी आज (८ जानेवारी) देशव्यापी ‘बंद’ची हाक दिली आहे. या बंदामध्ये आयएनटीयूसी, एआयटीयूसी, एचएमएच, सीआयटीयू, एआययूटीसी, टीयूसीसी, एसईडब्लूए, एआयसीसीटीयू, एलपीएफ, यूटीयूसी यांच्यासह अनेक कामगार संघटना सहभागी होणार आहेत. दरम्यान या संपात २५ कोटी कामगार सहभागी होणार अस्याचा दावा अनेक संघटनांनी केला आहे.

कर्माचाऱ्यांच्या १२ विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. कामगार संघटनांचा २ जानेवारीला झालेल्या बैठकीत सरकारतर्फे कामगारांना ठोस आश्वासन न मिळाल्याने कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदात कामगारांसोबत विद्यापीठातील फी वाढी, शिक्षण, विद्यापीठाचे निवडून आलेले पदाधिकारी आणि ६० संघटना या संपात सहभागी होणार आहे. १७५हून अधिक शेतकरी आणि कृषी कामगार संघटनांदेखील या संपाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान जेएनयू विद्यापीठातील हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात आंदोलन सुरू आहे. मात्र, आज होणाऱ्या कामगार संपात विद्यार्थ्या देखील सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जाते.

बीपीसीएल विक्रीचा निर्णय घेण्यात आला, बीएसएनएल-एमटीएनएल विलिनीकरणाची घोषणा झाली, ९३,६०० दूरसंचार कामगारांना व्हीआरएसच्या योजनेतून बाहेर काढण्यात आले, रेल्वेचे खासगीकरण, ४९ संरक्षण उत्पादनांचे कॉर्पोरेटायझेशन आणि बँकांचे विलीनीकरण करण्याच्या विरोधातही या कामगार संघटना आहेत, अशा अनेक बाबीकामगार संघटनांनी या निवेदनात नमूद केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

४०० मुलांचा जीव वाचविण्यासाठी पोलीस बॉम्ब घेऊन धावला!

News Desk

स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ लढाऊ विमानातून राजनाथ सिंह यांची भरारी

News Desk

Republic Day | स्टार्ट-अप इंडियाच्या माध्यमातून तरुण पिढीला प्रोत्साहन

News Desk