HW News Marathi
महाराष्ट्र

अमित शाह यांनी भारताच्या मुलीचा मान राखला, कंगनाने मानले आभार!

मुंबई | अभिनेता सुशांतसिंग प्रकरणावरुन मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत हिच्या मदतीला केंद्र सरकार धावून आले आहे. केंद्र सरकारने कंगना राणावतला Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर कंगनाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जाहीर आभार मानले आहेत.

“आता कोणत्याही देशभक्ताचा आवाज दाबला जाणार नाही हे यावरुन सिद्ध होतंय. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानते. त्यांना वाटलं असतं तर ते मला काही दिवसांनंतर मुंबईत जाण्याचा सल्ला देऊ शकले असते. मात्र, त्यांनी भारताच्या या मुलीचा मान राखला आहे. त्यांनी माझ्या स्वाभिमान आणि आत्मसन्मानाची रक्षा केली आहे. जय हिंद” असे ट्विट तिने केले आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1302846165637971969?s=19

 

मुंबई आणि मुंबई पोलिसांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर शिवसेनेसह महाराष्ट्रातील अनेक पक्षांनी कंगनावर टीकेची झोड उठवली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी तर कंगनाला मुंबईत आल्यानंतर धडा शिकवण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर वातावरण चांगलंच तणावपूर्ण झालं होतं. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कंगनाला सुरक्षा दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ९९३ वर, एकूण ६९ रुग्ण करोनामुक्त

News Desk

नवापूर मध्ये शेकडो शिवसैनिक भाजपात सामील

News Desk

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मार्केटमध्ये हापूस दाखल

swarit