HW News Marathi
महाराष्ट्र

कांजूरमार्गमधील ‘त्या’ कोरोना बाधिताने बाहेरगावी प्रवास केला नव्हता

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३०० च्या पुढे गेला आहे तर सगळ्यात जास्त रुग्ण हे मुंबईत आढळून येत आहेत. आज (२ एप्रिल) धारावीतही १ नवा कोरोना रुग्ण आढळला. तर दुसरीकडे मुंबईच्या उपनगरातील कांजूरमार्ग येथेही कोरोनाचा१ रुग्ण आढळला आहे. कांजूर पूर्वेच्या नेहरुनगर येथील चाळीत हा व्यक्ती वास्तव्यास आहे. त्यामूळे आता मुंबईच्या उपनगरातही भीतीचे अधिक वातावरण पसरले आहे.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचे वय ५६ वर्ष आहे आणि याने कधीही परदेशात प्रवास केला नाही आहे. तरीही त्याला लागण कशी झाली याचा शोध घेतला जात आहे. ही व्यक्ती लालबागच्या एका दुकानात काम करत असून त्याच्या घरी तो आणि त्याची पत्नी असे २ जणं राहतात. मात्र, बाहेरगावी जाण्याची कोणतीही पार्श्वभूमी नसताना या व्यक्तीला कोरोना कसा झाला, हा प्रश्न यंत्रणांना पडला आहे.

याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नेहरूनगर परिसर सील करण्यात आला आहे. या परिसरात कंटेनमेंट झोनचे फलक लावण्यात आले आहेत. दरम्यान, चाळीसारख्या भागात जर कोरोनाचा फैलाव झाला तर ही जास्त चिंतेची बाब ठरु शकते. काल (१ एप्रिल) धारावी परिसरात कोरोनाचा १ रुग्ण सापडला होता आणि त्याचा कालच मृत्यूही झाला होता. तसेच, वरळी-कोळीवाडा आणि आदर्शनगरमधील ८६ जणांना पोद्दार आयुर्वेदिक रूग्णालयात क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांची मर्जी राखण्यासाठी बावनकुळे यांची सरकारवर टीका, पुरावे द्या अन्यथा सरकारची माफी मागा – महेश तपासे

News Desk

आनंद महिंद्रांनी मागितली कर्मचाऱ्याची माफी

News Desk

“कोण नारायण राणे माहित नाहीत!”, संजय राऊतांचा नारायण राणेंवर हल्ला

News Desk