HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे पैशांची अफरातफर करतायत, सोमय्यांचा गंभीर आरोप

मुंबई | भाजपचे नेते किरिट सोमय्या कायमच ठाकरे सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्दव ठाकरेवर टीका करत असतात. आज (१२ मार्च) सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर हल्ला केला आहे. नाईक कुटुंबीयांना पुढे करुन उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे पैशांची अफरातफर करत आहेत. परंतु, उद्धव ठाकरे तुमची गाठ माझ्याशी आहे. तुम्हाला सगळे हिशेब द्यावेच लागतील, असे वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली. मी नाईक कुटुंबीय आणि ठाकरे यांचा जमीन घोटाळा बाहेर काढला तेव्हा शिवसेनेचे १२ नेते माझ्याविरोधात एकटवले होते. मात्र, आता हे सगळे कुठे गेले, असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला.

अन्वय नाईक यांची पत्नी आणि मुलीने गुरुवारी पत्रकारपरिषद घेऊन किरीट सोमय्या यांनी फटकारले होते. किरीट सोमय्या ठाकरे कुटुंब आणि अन्वय नाईक यांच्यात झालेल्या जमीन व्यवहारात इतका रस का घेत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकारपरिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा टीकेची तोफ डागली. रश्मी ठाकरे यांनी आठ वर्षे कर भरलेला नाही. नाईक कुटुंबीय जमिनीची खरेदी-विक्री हा आमचा व्यवसाय असल्याचा दावा करत आहेत. ही गोष्ट चांगली आहे. पण ठाकरे कुटुंबाचाही हाच धंदा आहे, याविषयी कोणीही बोलत नाही. नाईक परिवाराला पुढे करून ते पैशांची अफरातफर करत असतील तर मला बोलावेच लागेल. ज्याने कोणी चोरीचा पैसा घेतला आहे तो परत द्यावाच लागेल. उद्धव ठाकरे यांची गाठ किरीट सोमय्याशी आहे. त्यांना सगळे हिशेब द्यावेच लागतील, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यातील जमीन खरेदीच्या व्यवहारावरुन भाजपकडून होणाऱ्या आरोपांसंदर्भात नाईक कुटुंबीयांकडून पहिल्यांदाच थेट उत्तर देण्यात आले. मुळात हा व्यवहार आठ ते दहा वर्षांपूर्वीचा आहे आणि जमीन खरेदी किंवा विक्री करणे हा गुन्हा आहे का? या व्यवहाराचा आणि अन्वय नाईक मृत्यूप्रकरणाचा संबंध आत्ताच का जोडला जात आहे, असा सवाल अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने केला. माझे वडील हे वास्तूविशारद होते. त्यांनी कित्येक नेत्यांना जमिनी विकल्या असतील. अगदी शेवटपर्यंत ते प्लॉटिंग करुन जमिनी विकायचे काम करत होते. यामध्ये गैर ते काय आहे? भाजप नेत्यांकडून आरोप होत असलेल्या जमिनीच्या सर्व सातबाऱ्यांची माहिती द्यायला आम्ही तयार आहोत. अगदी आमच्या बँकेचे तपशीलही आम्ही सादर करु, असे आज्ञा नाईक यांनी सांगितले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“फडणवीसांना अटक म्हणजे, अटक मटक चवळी चटक वाटलं का?”, चित्रा वाघ यांचा चाकणकरांवर पलटवार

News Desk

राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी; पुढील शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून सुरू होणार

Aprna

अवैधरित्या सागवान तस्करी करणारा टेंम्पो भोकर वनविभागाने पकडला

News Desk