HW News Marathi
महाराष्ट्र

“MPSC परीक्षेाठी आंदोलन करणारे विद्यार्थी लादेन समर्थक होते का?”, पडळकरांचा सरकारला सवाल

पुणे | राज्यात MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे निर्माण झालेली तणावाची परिस्थिती आता निवळली असून येत्या २१ मार्चला ही परीक्षा घेण्याचं राज्य लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आलं आहे. मात्र, त्यानंतर देखील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. काल (११ मार्च) जेव्हा परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली होती त्यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, आज (१२ मार्च) पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सरकारवर निशाणा साधला आहे.

पडळकर यांनी यावेळी नियुक्त्या रखडलेल्या ४२० उत्तीर्ण उमेदवारांचा मुद्दा देखील उपस्थित केला. “सरकारची जत्रा अन् कारवाई सतरा असा या सरकारचा कारभार सुरू आहे. २१ तारखेला जर परीक्षा झाली नाही, तर मी या विद्यार्थ्यांसोबत वर्षा निवासस्थानाबाहेर उपोषणाला बसेन”, असं पडळकर म्हणाले. तसेच, कोरोना काळात परीक्षा न झाल्यामुळे परीक्षार्थींसाठी २ वर्षांची वयोमर्यादा वाढवण्यात यावी, अशी देखील मागणी पडळकरांनी केली आहे.

विद्यार्थी लादेन समर्थक होते का?

दरम्यान, पुण्यात आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप करत पडळकरांनी सरकारवर निशाणा साधला. “मुळात २०१९ला हे सरकार विश्वासघाताने सत्तेत आलं आहे. या सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅमपैकी विश्वासघात हा एक प्रोग्रॅम आहे. कधी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत, कधी धनगर समाजाला निधी देण्याच्या बाबतीत, कधी शेतकऱ्यांच्या बाबतीत, कधी लाईट बिलाच्या बाबतीत. या विद्यार्थ्यांच्या बाबतीत परीक्षा पुढे ढकलून सरकारने विद्यार्थ्यांचा विश्वासघात केला आहे. विद्यार्थ्यांच्या भावनेशी सरकार खेळतंय. माझ्यासोबत आंदोलनात असलेले विद्यार्थी लादेन समर्थक होते का? मी पाकिस्तानातून आलो आहे का? पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार का केला?”, असे प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केले आहे.

वडेट्टीवारांवरून साधला निशाणा!

विजय वडेट्टीवारांच्या भूमिकेवरून देखील पडळकरांनी टीका केली आहे. “सरकारमधले मंत्रीच म्हणत आहेत की परीक्षा पुढे ढकलायला नको. एक मंत्री म्हणतात माझ्या परवानगीशवाय निर्णय घेतला. महाराष्ट्र सराकारची जत्रा आणि कारवाई सतरा अशी परिस्थिती आहे का? सरकारनं काल सांगितलं कर्मचाऱ्यांच्या टेस्ट आणि इतर तयारी व्हायची आहे. याचा अर्थ हे सरकार गाफील होतं”, असं ते म्हणाले. “२१ तारखेला परीक्षा नाही झाली, तर वर्षाच्या समोर मी उपोषण करेन आणि विद्यार्थ्यांना घेऊन बसेन. या ७ दिवसांमध्ये जी मुलं सेंटरजवळ येऊन थांबली आहेत, त्यांना ७ दिवसांचा प्रत्येकी २० हजार रुपये भत्ता द्या. या मुलांची भाडं भरायची परिस्थिती नाही, त्यांचे खायचे वांदे आहेत. करोनामुळे परीक्षा पुढे ढकलली. त्यासाठी २ वर्ष वयोमर्यादा पुढे वाढवून द्यावी”, अशी मागणी देखील पडळकरांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिसांनी सत्त्वशीला पृथ्वीराज चव्हाण यांना घेतले ताब्यात

News Desk

“तर भाजप पिछाडीवरच अशीच पिछाडी कायम राहू दे!” – नितेश राणे 

News Desk

राज्यातील जनतेने सोशल डिस्टन्सींग पाळून कोरोनाविरुद्ध सुरू असलेले युद्ध जिंकावे, जयंत पाटलांचे आवाहन

News Desk