HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे सरकार चालवतात की माफियांची टोळी, किरीट सोमय्या यांचा सवाल

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण आता राज्यातील राजकारणातील एक गंभीर विषय बनला आहे. या प्रकरणावरून भाजप चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील सरकारवर निशाणा साधला आहे.राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या तीन बायका आहेत, तरी शरद पवारांनी त्यांना वाचवलं, आता संजय राठोडांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाचवत आहेत. राठोडांना अटक करायला हवी होती, अशी आक्रमक मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे सरकार चालवतात की माफियांची टोळी, हा प्रश्न आहे. वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा नाही, तर त्यांची हकालपट्टी व्हायला हवी होती. राठोडांना ताबडतोब अटक करायला हवी होती. धनंजय मुंडेंना तीन-तीन बायका, त्यांना शरद पवार वाचवतात. संजय राठोड यांनी २२ वर्षांच्या तरुणीच्या आयुष्याचा सत्यानाश केला आहे, त्यांना उद्धव ठाकरे वाचवतात, असा घणाघाती आरोप किरीट सोमय्या यांनी केला. मुंबईच्या महापौरांनी गाळे ढापले, अनिल परब यांनी म्हाडाची जमिन ढापली, उद्धव ठाकरे यांनी १९ बंगले ढापले, असा आरोपही किरीट सोमय्यांनी केला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या पुजेसाठी अजित पवार पंढरपुरला जाणार

News Desk

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे घेणार राष्ट्रपतींची भेट!

News Desk

ऑल द बेस्ट ! दहावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात

swarit