HW News Marathi
कृषी

शेतकरी सन्मान योजनेचा बोजवारा, शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेले पैसे गेले परत

विशाल पाटील मुंबई | मोठा गाजावाजा करत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचं उद्घाटन केले मात्र या योजनेचा नांदेडसह राज्यात बोजवारा उडालाय हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेले दोन हजार रुपये काही तासांतच परत करण्याचे आदेश अनेक बँकाना आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.रविवार असूनही केंद्र सरकारच्या निर्देशाने सर्वच बँकाचे कामकाज सुरु होतं.

केंद्र शासनाच्या शेतकरी सन्मान योजनेतील 6 हजार रूपयांपैकी दोन हजारांचा पहिला हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होते असाच प्रकार वाळूंज ता.नगर येथील शेतकरी मिनीनाथ निमसे यांच्या बाबतीत झाला आहे. निमसे यांना मेसेज मोबाईल वर मिळाला. त्यांनी याबाबत एटीएम मधून आपले बँक स्टेटमेंट काढले असता त्यांच्या खात्यावर २४ फेब्रुवारी रोजी २ हजार रूपये जमा झाल्याचे दिसून आले पण त्याच खात्यातून ते परत माघारी वळविण्यात आल्याचेही दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांचा सन्मान केलाय की अपमान अशी चर्चा आता सर्वत्र सुरू आहे.

साडेचार वर्षाच्या नाकर्तेपणावर निवडणुकीपूर्वी पांघरून घालण्यासाठी सरकारने चालविलेल्या घिसाडघाईमुळेच हा गोंधळ होतो आहे. शेतकऱ्यांना यामुळे मदती ऐवजी मनस्तापच वाटयाला येणार हे उघड आहे. शेतकऱ्यांचा हा सन्मान नव्हे अपमान आहे. अशी टीका किसान सभेचे डाॅ अजित नवले यांनी केलीय

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साखर उद्योगासाठी केंद्र सरकारकडून ४५०० कोटींचे पॅकेज

swarit

फळं खरेदीसाठी चीनी व्यापारी शेतक-यांच्या बांधावर

News Desk

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 16 जुलैपासून दूध संकलन बंद

News Desk