HW News Marathi
महाराष्ट्र

‘आता गोकुळचा दबदबा मुंबईत वाढवणार ‘सतेज पाटलांचं ठरलयं!

कोल्हापूर | महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चेत असणारी निवडणुक म्हणजे गोकुळ दूधसंघ. २ मे ला निवडणुक झाली आणि आज निकाल लागला. अखेर ३ दशकांपासूनची महाडिकांची निर्विवाद सत्ता सतेज पाटील यांनी मोडीत काढली आणि गोकुळ हाती घेतलं आहे .’आमचं ठरलयं गोकुळ उरलयं’ असं म्हणत लोकसभा,विधानसभेनंतर गोकुळकड् केलेली कुच सतेज पाटलांनी यशस्वी केली. गोकुळच्या २१ जागांपैकी १७ जागा मिळवत सतेज पाटील गटाने ‘गोकुळ’मध्ये सत्तांतर घडवून आणलं आहे. सत्ताधारी महाडिक गटाला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

हा निकाल सतेज पाटलांच्या राजकीय कारकीर्दीसाठी महत्वाचा आहेचं कारण महाडिक गटाला शह देण्यासाठी गोकुळ हातात घेणं महत्वाचं होतं. या निकालावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले की, दूध उत्पादकांनी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीला १७ जागा देत चांगलं यश दिलं आहे. सर्व दूध उत्पादकांचे मनापासून डोकं टेकवून मी आभार मानतो.

निवडणुका संपल्यात, कोणी काय केलं याऐवजी आम्ही काय करणार याकडे लक्ष देणार आहे. आता आमचा नवा अजेंडा आहे. मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार असून शेतकऱ्यांना २ रुपये दर वाढवून देणार आहोत. निवडणुकीत दिलेलं आश्वासन मागे पडणार नाही. काही उणिवा दूर करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्या असं सतेज पाटील म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर अण्णा हजारेंचे उपोषण मागे! फडणवीसांच्या मध्यस्थीने घेतला निर्णय

News Desk

बेडूक आणि त्यांची दोन पोरं या पक्षातून त्या पक्षात जातात, मुख्यमंत्र्यांचा नारायण राणेंवर निशाणा

News Desk

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये,काँग्रेसची विनंती

News Desk