HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूर देशातील तिसरे केरोसिनमुक्त शहर

गडहिंग्लज : चंदीगड व दिल्लीनंतर कोल्हापूर हे देशातील तिसरे केरोसिनमुक्त शहर ठरले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे दरमहा तब्बल साडेतीन कोटींची बचत होत आहे.

दरमहा जिल्ह्यातील चार लाखांहून अधिक कुटुंबांना सुमारे १३ हजार मेट्रिक टन धान्य वितरित केले जाते. ई-पॉझ मशीनवरील बायोमेट्रिक रेशनिंग योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे साधारणपणे १० टक्के धान्याची बचत होऊन हजारो कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत जमा होत आहेत. त्याबरोबरच वितरण व्यवस्थेत कमालीची पारदर्शकता आली असून, सर्व प्रकारच्या गैरप्रकारांनाही आळा बसला आहे.

गावागावांतील रास्त भाव दुकाने भविष्यात मिनीबँकम्हणून काम करतील. ३० सप्टेंबरपर्यंत शिधापत्रिकांना आधारकार्ड लिंक करण्याची मुदत आहे. त्यानंतर आधारकार्ड शिधापत्रिकेला न जोडल्यास धान्य बंद होण्याची शक्यता आहे. द्वार वितरणपद्धतीच्या माध्यमातून रेशनिंगचे धान्य थेट रास्त भाव दुकानदारांच्या दुकानात पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे वाहतूक,हमाली व गोदामावरीलदेखील खर्च कमी होऊन आणखी बचत होण्यास मदत होईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पश्चिम महाराष्ट्राच्या मदतीसाठी रामराजे नाईक-निंबाळकर सरसावले!

News Desk

“अतिवृष्टीमुळे कोळशाचा पुरवठा आणि उत्पादनात घट”- कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी

News Desk

शिवसेनेचा मंत्री फडणवीसांना भेटायला तडफडत होता, निलेश राणेंच्या दाव्यावर उदय सामंत म्हणतात…

News Desk