HW News Marathi
महाराष्ट्र

वंचित आघाडी आता बहुजनांची नव्हे, तर उच्चवर्णीयांची झाली | लक्ष्मण माने

पुणे | लोकसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीमध्ये सार काही आलबेल आहे, असे सध्या दिसत नाही. वंचित बहुजन आघाडीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच फूट पडत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहे. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे लोक घुसल्यामुळे सध्याची वंचित आघाडी ही बहुजनांची नव्हे, तर उच्चवर्णीयांची झाली आहे. वंचित बहुजन आघाडी ही खरी आमची आहे. माने यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर असा खळबळजनक आरोप करत वंचितचे प्रवक्ते लक्ष्मण माने यांनी पक्षाला रामराम केला आहे.

वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करत मानेंनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आंबेडकरांसोबत काम करण्याची पद्धत चुकीची असल्याचे सांगतना, पक्षात संघाच्या लोकांना स्थान देणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनीच आता राजीनामा द्यावा, अशी मागणी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माने यांनी केली. माने यांनी गोपीचंद पडळकर यांना वंचित बहुजन आघाडीचे महासचिवपद दिल्याने नाराजी व्यक्त केली आहे.तसेच पडळकर यांनी माने राष्ट्रवादी काँग्रेसचे हस्तक असल्याचा आरोप एका वृत्तवाहिनीशी बोलताना आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘तुमचा सिलेंडर आमच्या घराच्या सुखसमृद्धीत आणि शांतीमध्ये आग लावत असेल तर’, राष्ट्रवादीचा इशारा!

News Desk

राज्यपालांकडे कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही – शरद पवार

News Desk

“बुस्टर डोस मला माहित नाही पण, हा मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल”, राऊतांचा भाजपला टोला

Aprna