HW News Marathi
Covid-19

अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय आता १० ऑगस्ट ला होणार !

दिल्ली | कोरोनाच्या काळात अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षांचा निर्णय पुन्हा लांबणीवर पडला आहे. परिक्षा घेतल्या जाऊ नयेत किंवा त्या रद्द केल्या जाव्यात यासाठी न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. UGCने सर्व विद्यापिठांना या परिक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याच्या सुचना केलेल्या आहेत. UGC ने केलेल्या मार्गदर्शक नियमावलीला युवा सेनेसह देशभरातील काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे. या याचिकांवर आज निकाल अपेक्षित होता मात्र, न्यायालयानं याचिकांवरील सुनावणी १० ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय आणखी लांबणीवर पडला आहे.

न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर एकत्रित सुनावणी घेताना न्यायालयाने आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयोगाने आपली भूमिका मांडणारे प्रतिज्ञापत्र गुरुवारी न्यायालयात दाखल केले. विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्यायलाच हव्यात, अशी ठाम भूमिका मांडताना त्याची कारणेही स्पष्ट करण्यात आली होती. या याचिकांवर आज सुनावणी होणार होती. न्यायालयानं या याचिकांवरील सुनावणी १० ऑगस्टपर्यंत तहकूब केली आहे. त्यामुळे याचिकांवर आता १० ऑगस्ट रोजी पुढची सुनावणी होणार आहे.

हे ही वाचा

विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्ष परिक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी आदित्य ठाकरे UGC च्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात…

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र सरकार ठाम, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बीकेसीत कोविड १९ सेंटरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन, १ हजार बेडची व्यवस्था

News Desk

“मुख्यमंत्री साहेब, सरकार इतकं निर्दयी कसं झालं…?” नववर्षाच्या मुहूर्तावर ‘मनसे’चा बोचरा सवाल 

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आजचा रायगड जिल्हा दौरा रद्द

News Desk