HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांनी ‘या’ निर्णयावर मुख्यमंत्र्यांचे केले अभिनंदन

मुंबई | राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या (२४ फेब्रुवारी) सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज (२३ फेब्रुवारी) फडणवीसांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी फडणवीसांनी महाविकासआघाडी सरकारव शेतकरी कर्जमाफी, महिलांवरील वाढेत अत्याचार, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्रवीर सावरकर आदी मुद्द्यावरून टीकास्त्र सोडली. मात्र, यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अभिनंदन करत त्यांचे कौतुक केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

दरम्यान, फडणवीसांनी आज सरकारच्या चहापानावर भलेही बहिष्कार टाकला. मात्र, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (सीएए) पाठिंबा आणि एल्गार परिषद प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवण्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. फडणवीस म्हणाले की, “या दोन्ही निर्णयासाठी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करतो, असे ते म्हणाले. ‘कोरेगाव-भीमा आणि एल्गार हे वेगळे नाही, हेच आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. तपासाची व्याप्ती आता वाढली असल्याने तो केंद्र सरकारकडे जाणेच योग्य आहे,” असेही ते म्हणाले.

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजप युती तुटली. यानंतर राज्यात राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना असे नवीन सत्ता समीकरण उदयास आले. या महाविकासआघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहे. फडणवीसांनी ठाकरेंचे अभिनंदन केल्यामुळे राजकीय वर्तुळा चर्चेला उधाण आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकास आघाडी सरकार पुन्हा सत्तेत येईल; मोदींच्या भेटीनंतर शरद पवारांचं मोठं विधान

News Desk

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता

News Desk

नितेश राणेंनी उपअभियंत्यांच्या अंगावर ओतला चिखल

News Desk