HW News Marathi
महाराष्ट्र

वीर पत्नींसाठी आजीवन मोफत एसटी प्रवास

मुंबई | देशसेवेसाठी प्राणाची आहुती देणा-या जवानांच्या पत्नींना एसटी महामंडळ आजीवन राज्यभर मोफत प्रवास देण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंतर्गत वीरपत्नींचा अनोख्या पद्धतीने सन्मान करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ मे महाराष्ट्र दिनापासून करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाच्या परिपत्रकात म्हटले आहे.

परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वीरपत्नींसाठी आजीवन मोफत पास देण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध केले. वीरपत्नींच्या माहितीसाठी महामंडळाने सैनिक कल्याण विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे.या पत्रात जिल्हानिहाय सैनिक कल्याण अधिकारी यांची माहिती मागवण्यात आली असून ती संबंधित एसटी जिल्हा अधिकाऱ्यांना पाठवून वीरपत्नींसाठी आजीवन मोफत प्रवासी पास देण्यात येणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिली ही प्रतिक्रिया

News Desk

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष होणार- संजय राऊत

News Desk

शरद पवारांचं राजकीय गणित असू शकतं, खडसेंच्या प्रवेशावर राऊतांची प्रतिक्रिया

News Desk
देश / विदेश

प्रियांका गांधी कँडल मार्चमध्ये कार्यकर्त्यांवर भडकल्या

News Desk

नवी दिल्ली | ‘गोंधळ घालयचा असेल तर सरळ घरी जा,’ अशा शब्दात प्रियांका गांधी कार्यकर्त्यांवर भडलकल्या. कठुआ आणि उन्नाव या दोन्ही बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ गुरुवारी रात्री काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस मुख्यलयापासून इंडिया गेटपर्यंत कँडल मार्च काढण्यात आला होता.

महिलांवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणी राहुल गांधी यांनी कँडल मार्चच्या माध्यमातून सरकारकडे केली. कँडल मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी प्रियांका गांधी आल्या होत्या. त्यानंतर प्रियांका गांधी यांच्यासोबत सेल्फ काढण्यासाठी कार्यकर्ते धडपड करत होते. तेव्हा हा मोर्चा मागचा उद्देश लक्ष्यात घ्या, असे ही प्रियांका गांधी कार्यकर्त्यांना म्हणाल्या. पण, कार्यकर्त्यांचा गोंधळ थांबत नव्हता. या मार्चमध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी बहुसंख्य लोकांनी सहभाग नोंदवला.

भाजपचे आमदार कुलदीप सिंह सेंगर यांनी उन्नावमध्ये १६ वर्षीय तरुणीवर साहमुहिक बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तर दुसरीकडे कठुआमध्ये ८ वर्षीय अल्पवयीन मुलीवर साहमुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

Related posts

पवारांच्या बंगल्यावर भाजप ‘जय श्रीराम’चे ५० हजार पोस्टकार्ड पाठवणार

News Desk

पूरग्रस्त भागांचा मुख्यमंत्र्यांनी दौरा करावा व तात्काळ मदत जाहीर करावी – ॲड. प्रकाश आंबेडकर

News Desk

शरद पवारसाहेब सरकारला मार्गदर्शन करत असतील तर तुमच्या पोटात दुखायचे कारण काय ? राष्ट्रवादीचा भाजपला सवाल

Gauri Tilekar