HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई लोकलबाबत आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई | मुंबईकर आणि सर्व चाकरमानी मुंबई लोकल कधी सुरू होणार याच्या प्रतिक्षेत आहेत. यावर मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चलह यांनी लोकल बाबत महत्वाची माहिती दिली आहे. दिवाळीनंतरच्या आठवड्याचा आढावा घेतल्यानंतरच मुंबई लोकल सुरु करण्याबाबत विचार करता येईल अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.दिवाळीनंतरचा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे. या आठवड्यात कोरोना बाधितांच्या संख्येत कितपत वाढ होत आहे. हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

कारण गर्दीच्या ठिकाणी लोकांच्या संपर्कात आलेले व्यवसायिक, हॉटेल चालक, भाजी बाजार या प्रत्येक ठिकाणी मुंबई महापालिकेने कोरोना चाचणीची शिबिरं भरवलेली होती. तसेच दिवाळीच्या दिवसांत अनेक नागरिकांनी प्रवास केला आहे. तसेच दिवाळीसाठी गावी गेलेल किंवा सुट्ट्यांसाठी बाहेरगावी गेलेले मुंबईकर आता पुन्हा मुंबईत परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांचे या आठवड्यातील आकडे कसे असतील? कोरोनाची स्थिती कशी असेल? यावर मुंबई लोकल सुरु करण्याचा कोणताही निर्णय अवलंबून असेल, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिली आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह यांनी दिलेल्या माहितीमुळे मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याचा निर्णय काही दिवसांसाठी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतरच्या या आठवड्यातील कोरोनाची किंवा कोरोनाग्रस्तांच्या नव्या रुग्णांची स्थिती पाहूनच मुंबई लोकलसंदर्भातील कोणताही निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुशे सर्वसामान्यांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

12 वर्षीय मुलगी 27 आठवड्यांची गर्भवती

News Desk

देवेंद्र फडणवीस म्हणजे बसवलेला मुख्यमंत्री !

News Desk

फडणवीस नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते पण… शिवसेनेचा गौप्यस्फोट

News Desk