HW News Marathi
Covid-19

लॉकडाऊनचा निर्णय येत्या ८ दिवसांत होणार ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या लोकांना काय इशारा दिला ?

मुंबई | राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पार्श्वभूमिवर आज राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यात दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याची भीती व्यक्त केलीय. कोरोनाची परिस्थिती अजून गंभीर होत असून, राज्यात दुसरी लाट आली की नाही हे लवकरच समजणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. संपर्काची साखळी तोडणं हाच कोरोनावरचा उपाय, आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.अमरावती,अकोला,यवतमाळ,वाशिम या ठिकाणी निर्बंध लावण्यात येत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संभाषणातील महत्वाचे मुद्दे

-सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळलं, तर कारवाई करणार : उद्धव ठाकरे

-आपल्याला काही गोष्टी पाळाव्याच लागतील. आता एक बंधन पुन्हा आपल्याला पाळावं लागणार आहे. मंत्री नितीन राऊत यांनी घरचा विवाह सोहळा रद्द केला. याला म्हणतात खरी सामाजिक जाणीव. जनतेच्या वतीनं तुमच्या मुलाला आशीर्वाद : उद्धव ठाकरे

-संपर्काची साखळी तोडणं हाच कोरोनावरचा उपाय : उद्धव ठाकरे

-कोविडयोद्धा होता नाही आलं तर कोविड दूत तरी होऊ नका. अमरावतीमध्ये हजाराच्या आसपास रुग्ण सापडलेत. ज्यावेळेस कोरोना टोकावर होता तेव्हाही अशी स्थिती नव्हती : उद्धव ठाकरे

-शिवरायांनी शत्रूशी लढण्याची जिद्द दिली. जिंकण्याची जिद्द, इर्ष्या शिवरायांनी दिली. वार करायचा असेल तर तलवार झेलायचा असेल तर ढाल. कोरोनाचं युद्ध लढताना आपल्या हाती तलवार नाही. पण आपल्या हाती मास्क हीच आपली ढाल – उद्धव ठाकरे

-कोरोना महाराष्ट्रात येऊन आता वर्ष पूर्ण होईल. ती जी परिस्थिती होती ती भयानक होती. पुढच्या महिन्यात वर्ष पूर्ण होईल. ह्या सर्व काळात समाधानाचा क्षण कोणता? तुम्ही मला तुमच्या कुटुंबातला सदस्य मानलं हा समाधानाचा क्षण. हे असं असायला भाग्य लागतं. ते दिवस खूप भयानक होतं – उद्धव ठाकरे

-लसीकरण कधी तर उपरवाले की मेहरबानी. केंद्र सरकार ठरवतंय की कुठल्या राज्याला किती द्यायच्या. आणखी काही कंपन्यांच्या लस येतील. तोपर्यंत काय काय करायचं. शिवरायांना वंदन करणं हे पवित्र काम काम : उद्धव ठाकरे

-यात्रा,सभा,मिरवणुका यांना उद्यापासून राज्यात बंदी

– जर सगळ्या गोष्टी पाळण्यात आल्या नाहीत तर कडक लॉकडाऊन करण्यात येईल,मुख्यमंत्र्यांचा इशारा

-‘माझे कुटुंब माझे मोहिम’ याप्रमाणे आपण ‘मी जबाबदार’ ही नविन मोहिम राबवायला हवी आहे.

-उद्या रात्रीपासून जिथं वाटतं तिथं बंधनं घाला, मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

-लॉकडाऊन करायचा की नाही या प्रश्नाचं उत्तर येत्या ८ दिवसांत नागरिकांकडूनचं मिळेल,उद्धव ठाकरेंचा थेट जनतेच्या कोर्टात चेंडू.ल़ॉकडाऊन नको असेल तर मास्क वापरा,हात धुवा आणि सुरक्षित अंतर राखा .

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१८ वर्षावरील नागरिकांना मोफत लसीचं गिफ्ट मिळणार? अजित पवार म्हणतात…

News Desk

केंद्राकडून महाराष्ट्राला मदत मिळालीच पाहिजे | राहुल गांधी

News Desk

सगळ्यांसाठी समान नियम ठेवा, परदेशी कंपन्यांच्या लसींसाठी नियम शिथिल केल्यानंतर सिरमची केंद्राकडे मागणी

News Desk