HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊत आणि हर्षवर्धन पाटील यांच्या गळाभेटीचे कारण काय…?

अकोले | राजकीय वर्तुळात कधी कोणता विषय चर्चेचा ठरेल काही सांगू शकत नाही. असाच आणखी एक विषय चर्चेचा ठरला आहे. ती म्हणजे संजय राऊत आणि हर्षवर्धन पाटील यांची गळाभेट. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि माजी सहकारमंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची गळाभेट झाल्याने इंदापूर तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

काल (२१ फेब्रुवारी) अकोल्यात खासदार संजय राऊत एका खासगी कार्यक्रमानिमित्त आले होते. या निमित्ताने पाटील आणि राऊत या दोघांच्या गळाभेटीने तालुक्यातील राजकीय चित्र बदलणार की काय, अशी चर्चा रंगली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये जाऊन त्या तिकिटावर निवडणूक लढविली होती.

यात त्यांचा पराभव झाला होता. यानंतर आता ही गळाभेट घेतल्याने राजकीय चर्चा जोर धरू लागली आहे. या भेटीवर हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्टीकरण देत या भेटीमध्ये कोणताही राजकीय उद्देश नसून तालुक्यात आलेल्या पाहुण्यांची गळाभेट घेऊन स्वागत करणे ही परंपरा असल्याचे पाटील यांनी नमूद केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानपरिषदेच्या चारही जागांचे निकाल जाहीर

News Desk

राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज

News Desk

मुस्लिम नागरिक ४ विवाह करु शकतात मग… महाराष्ट्र करणी सेनेचा सवाल 

News Desk