HW News Marathi
महाराष्ट्र

लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे भाजपने रणसिंग फुंकले

मुंबई | महाराष्ट्रात आगामी लोकसभा आणि विधानसभानिवडणुकीत केवळ भाजपचे कमळ फुलेल, यासाठी तयारीला लागण्याचा संदेश भाजपने दिला. निमित्त जरी भाजपच्या वर्धापनदिनाचे असले तरी भाजपने आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकल्याचे यातून दिसून आले.
या मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते जमा करण्यात पक्षाला यश आले. अमित शहापुढे जोरदार प्रदर्शन करण्याचा भाजप नेत्यांनी कसोशिने प्रयत्न केला. राज्य मंत्रिमंडळातील भाजपचे सर्व मंत्री, पदाधिकारी, आमदार, खासदार आदी या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या भ्रष्ट्र कारभारावर सडकून टीका केली. तसेच आगामी काळात पारदर्शक कारभार देण्याचे आश्वासन दिले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“…नाहीतर भाजप खासदारांना ठोकणार”, हर्षवर्धन जाधवांचा थेट इशारा

News Desk

नागपूर येथील ‘वनभवन’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण; उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा होणार सन्मान

Aprna

आदिवासी बांधवांनी साजरा केला जागतिक आदिवासी दिन

News Desk
महाराष्ट्र

भाजपाचा महामेळावा सुरु होण्याआधीच भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस

News Desk

मुंबई | भाजपच्या 38 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईच्या एमएमआरडीए ग्राऊंडवर आज भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते दाखल झाले आहेत. या मेळाव्यात दिवंगत गोपीनाथ मुंडे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भाजपला मुंडेंचा विसर पडल्याची टीका काही कार्यकर्त्यांनी केली आहे. भाजपच्या या कार्यक्रमातील एकाही पोस्टरवर गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नाही. गोपीनाथ मुंडे यांचा विसर पडल्याने बीडचे मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. ठिकठिकाणी झळकत असलेल्या पोस्टर्सवरून गोपीनाथ मुंडे यांचा फोटो गायब आहे.

त्यामुळे मुंडे समर्थकांनी सभास्थळी घोषणाबाजी सुरू केली. गोपीनाथ मुंडे यांचा फोटो पोस्टरवर लावण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, भाजपच्या या मेळाव्यामुळे मुंबईतील वाहतूक ठप्प झाली असून चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत आहे. काही ठिकाणी मुंबईकरांनी भाजप कार्यकर्त्यांच्या बसेस अडून धरल्याच्या घटना घडल्या आहेत.

Related posts

चेंबूर दुर्घटनेप्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया..!

News Desk

अनुसूचित जाती वस्ती विकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी जीआयएस मॅपिंग! – मंत्री संजय राठोड

Aprna

महाविकास आघाडी सरकारमध्ये आपली जागा फक्त खलिता वाहणाऱ्या काशिदाची; साटमांचा राऊतांना टोला

Aprna