HW News Marathi
महाराष्ट्र

#LokSabhaElections2019 : महाराष्ट्रात ४ टप्प्यात मतदान होणार

नवी दिल्ली | देशातील १७ व्या लोकसभा निवडणुकीचे आज (१० मार्च) बिगुल वाजले आहे. देशातील २९ राज्यात एकूण ७ टप्प्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार असून २३ मे रोजी निकाल लागणार आहे. महाराष्ट्रात ४ टप्प्यात निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात ४ टप्प्यात लोकसभा निडवणुका होणार आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांसाठी निवडणुका लढविल्या जातात. राज्यात ८ कोटी ७३ लाख मतदार असल्याचे आयोगाने सांगितले आहे.

राज्यात २५ मार्च ही निवडणूक अर्ज भरण्याची अंतिम तारीख असल्याची माहिती राज्या निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे. सात दिवसात उमेदवरांनी लोकसभा निवडणुकांचे अर्ज भरण्यास सुरुवात करावी असे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

महाराष्ट्रात ११ एप्रिलमध्ये ७ जागांसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. १९ मे रोजी अंतिम टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. १७ व्या लोकसभा निवडणूक ही ३९ दिवसांत आटोपणार आहे. तसेच १६ व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यकाळ ३ जूनला संपणार आहे.

१८ एप्रिल रोजी १० जागांसाठी दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. तर २३ एप्रिल रोजी १४ जागांसाठी तिसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. आणि २९ एप्रिल रोजी १७ जागांसाठी चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले आहे. निवडणूक आयोगाने दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

महाराष्ट्रात ‘या’ चार टप्प्यात लोकसभा निवडणुका

 

  • महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात (११ एप्रिल) ७ जागांवर मतदान
  • दुसऱ्या टप्प्यात (18 एप्रिल) १० जागांवर मतदान
  • तिसऱ्या टप्प्यात (२३ एप्रिल) १४ जागांवर मतदान
  • चौथ्या टप्प्यात (२९ एप्रिल) १७ जागांवर मतदान

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…जेव्हा गडकरींना देण्यात आली होती काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर; कार्यक्रमात सांगितला किस्सा

News Desk

महाराष्ट्रात होणार जी २० परिषदेतील १३ बैठका; मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी घेतला नियोजनाचा आढावा

Aprna

“वडेट्टीवारांचं वय बघता त्यांना जरा वाट पाहावी लागेल”, थोरातांचा सल्ला

News Desk