HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्राने GSTचे थकीत २८ हजार कोटी तातडीने द्यावे – रोहित पवार

मुंबई | राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. त्यांना तातडीची मदत केली जावी अशी मागणी होत आहे. यावरुन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आघाडी सरकारने पंचनामे करण्यात वेळ न घालवता तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे. तर, राज्य सरकार केंद्राने जीएसटीचे पैसे लवकर द्यावे अशी मागणी करत असताना केंद्राकडे राज्याचे कोणतीही पैसे नाहीत असे म्हटले जात आहे.या सगळ्यावर राष्ट्रवादीच्या आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. केंद्राने जीएसटीचे थकवलेले पैसे लवकर द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

“दु:ख वाटून घेण्याचा आपली संस्कृती आहे. आज बळीराजावर दुःखाचा डोंगर आहे. तो दूर करायचा असेल तर प्रत्येकाला जबाबदारी घ्यावीच लागेल. राज्य सरकार ती जबाबदारी घेत आहे पण केंद्राने राज्याचे जीएसटीचे थकीत २८ हजार कोटी रुपये तातडीने द्यावे”, अन्नदात्याला आणि असंघटित क्षेत्राला सावरण्यासाठी हे करण्याची विनंतीच रोहित पवारांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता सत्ता स्थापनेसाठी आम्हाला काही घाई नाही !

News Desk

#Vidhansabha2019 : पुण्याच्या ८ ही जागा भाजपकडे

News Desk

इंदू मिलमधील डॉ.बाबासाहेबांचे स्मारक, जगाला प्रेरणा देणारे ठरेल | मुख्यमंत्री

News Desk