HW News Marathi
महाराष्ट्र

लोणार सरोवराचे पाणी लाल गुलाबी होण्याचे कारण काय?

बुलढाणा | जगातल्या आश्चर्यांपैकी एक असलेल्या बुलढाणाच्या लोणार सरोवरात एक आश्चर्यकारण बदल घडला आहे. कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात लोणार सरोवराकडे कुणी फिरकलं नाही. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर तेथे गेलेल्या लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण लोणार सरोवरातील पाणी चक्क गुलाबी लाल रंगाचे झाल्याचे लक्षात आले आहे. हा नैसर्गिक चमत्कार नेमका काय आहे याबाबत आता अभ्यास केला जाणार आहे.

प्रा, सुधाकर बुगदान हे सरोवराच्या जतनासाठी परिश्रम घेत आहेत.. तसेच त्याचा अभ्यास देखील करत आहे. सध्या सरोवराचे पाणी लाल झाले याविषयी त्यांनी अशी माहिती दिली की हे पाणी साधे पाणी नसून रासायनिक द्रव्य आहे. या पाण्यात क्षारयुक्त पदार्थ असल्याने ते खारे आहे. काही वर्षांपर्यंत हे प्रमाण १४.५ % होते मात्र प्रदूषणामुळे ते ९.५ % झाले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाणी कमी होते. आणि रंग फिकट पिवळा होतो. मात्र वाढत्या प्रदूषणामुळे सरोवरातील अल्कधर्मी पाण्यात आमला गुणधर्म आल्याने पाणी लाल जायचं मत त्यांनी सांगितलं.

लोणार सरोवरातील पाणी लाल-गुलाबी होण्याबाबत स्थानिकांच वेगळच मत आहे. लोणार सरोवरात शहरातील घाण पाणी जाते. त्यामुळे सरोवरात प्रदूषण होत आहे. प्रदुषणामुळेच लोणार सरोवराचे पाणी गढूळ दिसत आहे, ते लाल रंगाचे नाही, असा त्यांचा दावा आहे. शहरातील घाण आणि सांडपाणी सरोवरात जाऊ नये म्हणून शासनाने निरीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून शुद्ध पाण्याचा प्रकल्प उभा केला. पण तो बंदच आहे. त्यामुळे प्रदुषण वाढल्यानेच हा प्रकार घडला असावा, असे मत लोणार सरोवर विकास व जतन समितीचे सदस्य प्रा. बळीराम मापारी यांनी व्यक्त केले.

लोणार सरोवराच्या अभ्यासकांमध्येही याबाबत मतभिन्नता असल्याचे समोर येत आहे. मात्र हे पाणी लालसर झाल्याबॅक्टेरिया वाढल्यामुळे एका रात्री असा बदल होऊ शकत नाही त्यामुळे याचे नेमके कारण शोधणे गरजेचे झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

संजय राऊतांच्या टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर, तर परबदेखील निशाण्यावर!

News Desk

तळीये दुर्घटनेत मृतांच्या आकड्यात भर! १५ दिवसांनी एका महिलेचा मृत्यू

News Desk

केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेत साडेचार कोटींचा गैरव्यवहार उघड, | रक्कम वसूल करण्याचे मंत्र्यांचे आदेश

News Desk