HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेत साडेचार कोटींचा गैरव्यवहार उघड, | रक्कम वसूल करण्याचे मंत्र्यांचे आदेश

मुंबई | हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील ८३ महाविद्यालयात केंद्र सरकारने दिलेल्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ४ कोटी २९ लाख रूपयांचा गैरव्यवहार झाला असून महाविद्यालयाकडून हे पैसे वसूल करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली आहे.

परभणीचे आमदार राहूल पाटील, अमर काळे, सुनील केदार, अमित झनक या आमदारांनी हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील महाविद्यालयात केंद्र सरकारने दिलेल्या शिष्यवृत्तीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा तारांकित प्रश्न उपस्थित केला.

या तारांकित प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात दोन्ही जिल्ह्यातील ८३ महाविद्यालयांनी समाजकल्याण विभाग आणि आदिवासी विभागाकडून देण्यात येणाऱ्या केंद्र सरकारच्या योजनेत ४ कोटी २९ लाख रूपयाचा गैरव्यवहार झाला असून या महाविद्यालयाकडून हे पैसे वसूल करण्यात येत असल्याचे सांगितले आहे.

८३ पैकी १० महाविद्यालयांनी गैरव्यवहाराच्या रकमा शासनाकडे परत केल्या आहेत. उर्वरीत महाविद्यालयाकडून वसूलीची कारवाई आदिवासी विकास विभागाकडून करण्यात येत असल्याचे लेखी उत्तरात सांगितले. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी प्रकल्प स्तरावर समिती गठीत करण्यात आली असून संबंधित महाविद्यालयाकडून पैसे वसूल करण्यात येत असल्याचे लेखी उत्तरामध्ये सांगण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेली ‘ही’ योजना ठाकरे सरकारकडून रद्द  

News Desk

बच्चू कडूंच्या युट्युब चॅनलला मिळाले सिल्व्हर प्ले बटन!

News Desk

पुढच्या महिन्यात ‘या’ तारखेला होणार आरोग्य विभागाच्या परीक्षा – राजेश टोपे

News Desk