HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्रीय मंत्रिमंडळातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रावसाहेब दानवे यांची ताबडतोब हकालपट्टी करावी

मुंबई | ज्याप्रमाणे ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या माध्यमातून असहकार आंदोलन पुकारले होते त्याच्याच प्रेरणेतून देशातल्या शेतकऱ्यांनी हा कृषी कायदा रद्द व्हावा त्यासाठी देशपातळीवर आंदोलन उभारले आहे. सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये अनेक चर्चा होऊन देखील सकारात्मक तोडगा निघत नाही ही चिंतेची बाब आहे. देशात अन्न सुरक्षेची जबाबदारी ज्या शेतकरी वर्गावर आहे त्यांच्या प्रश्नाबाबत मोदी सरकार हे पूर्ण पुणे उदासीन असल्याचे चित्र दिसून येते. शरद पवार देशाचे कृषिमंत्री असताना यूपीए सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय हे शेतकऱ्यांच्या हितासाठी व देशाच्या अन्नसुरक्षेच्या साठी घेतले. त्यामध्ये आधारभूत किंमत हा अतिशय महत्त्वाचा निर्णय होता.

याला प्रतिसाद देत देशभरातील सर्व शेतकऱ्यांनी अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन केले. फलोत्पादन, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन दुग्ध उत्पादन अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवारांनी ह्या देशातल्या शेतकऱ्यांना दिल्या व या सर्व योजनांचा आर्थिक फायदा देशातील शेतकऱ्यांना झाल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे.

यूपीए सरकारने देशातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या साठी ₹ ७० हजार कोटी ची कर्जमाफी योजना जाहीर केली त्यावेळेस देखील शरदचंद्र पवार साहेब हे देशाचे कृषिमंत्री होते याचा विसर भारतीय जनता पक्षाला पडलेला असावा. भारतीय जनता पक्षाचे एनडीए सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार नसून व्यापाऱ्यांचे आणि दलालांचे सरकार आहे.

भारतीय शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला चीन व पाकिस्तानचा पाठिंबा आहे अशा पद्धतीचे वक्तव्य करून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देशातल्या शेतकऱ्यांचा घोर अपमान केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून रावसाहेब दानवे यांची ताबडतोब हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी करत आहे.

राज्यातील महिला सुरक्षित राहाव्यात व बलात्कार यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास व शिक्षा लवकर व्हावी या दृष्टीने राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुढाकार घेऊन आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याचा अभ्यास केला व त्याच धर्तीवर महाराष्ट्रात शक्ती कायद्याला महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

करोनाच्या काळात राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यातल्या जनतेनी पुढे येऊन रक्तदान करावे असे आव्हान राष्ट्रवादीच्या खासदार सौ सुप्रिया ताई सुळे व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश भैय्या टोपे यांनी केलं आहे व आज दुपारी तीन वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे खासदार सुप्रिया सुळे व ना.राजेश भैय्या टोपे हे स्वतः रक्तदान करणार आहेत. राज्यातल्या तरुणांनी,स्वयंसेवी संघटनांनी मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यात शहरात तालुकास्तरावर रक्तदान करावे अशी विनंती राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे महेश तपासे यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुमच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे”, मुनगंटीवारांचे मोठे विधान

News Desk

हाताला सलाईन, अंगात अशक्तपणा, तरीही धैर्यशील माने भर पावसात मराठा मोर्चाच्या अग्रस्थानी!

News Desk

जल आक्रोश नव्हे हा तर भाजप नेत्यांच्या आतला आक्रोश; धनंजय मुंडेंचा खोचक टोला

News Desk