HW News Marathi
महाराष्ट्र

सावित्रीच्या लेकी रोज बळी पडतायेत यांच्यासाठी सरकार कधी करतयं महाराष्ट्र बंद – चित्रा वाघ

पुणे। पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात एका अल्पवयीन विद्यार्थीनीची कबड्डी खेळत असताना तिच्यावर कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आल्याच्या घटनेमुळे महाराष्ट्र सुन्न झाला आहे. माणुसकीला काळीमा फासणारी आहे. म्हणूनच या घटनेवर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.अतिशय भयानक काय चाललयं पुण्यात कोयत्याने वार करून खून टाईप करतांनाही अंगावर काटा येतोय काय भोगलं असेल तीने कायदा सुव्यवस्था वार्यावर पोलिस कायदे कागदावर महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडताहेत यांच्यासाठी सरकार कधी करतयं महाराष्ट्रबंद अशा शब्दात ठाकरे सरकारवर चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली.

अजित पवारांनी दिल आश्वासन

“पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेनं खाली गेली असून मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शासन करण्यात येईल,” असं आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवा, फडणवीसांनी याकामी पुढाकार घ्यावा, संजय काकडेंची भूमिका

News Desk

विधानसभा निवडणुकीनंतर मुंडे बहिण-भाऊ पहिल्यांदाच एका व्यासपीठावर

swarit

कुठेही गोंधळ गडबड करायची नाही, तोडफोड करायची नाही, राज ठाकरेंचे मनसैनिकांना आवाहन

News Desk