HW News Marathi
महाराष्ट्र

हिंगणघाट जळीत कांड : आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल !

वर्धा | हिंगणघाट जळीत कांडातील पीडित तरुणीची मृत्यूशी झुंज अपयशी झाली आहे. पीडितेने गेल्या सात दिवसांपासून मृत्यूशी झुंज दिली. तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र ऑरेंज सिटी रुग्णालयातमध्ये आज (१० फेब्रुवारी) पीडित तरुणींची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर राजकीय नेत्यांसह अनेकांकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. ‘ही हत्या असून याला शिक्षा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

दरम्यान, दरम्यान, ‘आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल. या खटल्याचा पाठपुरावा करुन, तो लवकरात लवकर निकाली काढू. अनेकदा खटला लांब चालतो. निकाल लागल्यानंतरही अंमलबजावणीसाठी वेळ लागतो. मी तसे होऊ देणार नाही, लवकरात लवकर गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल. असं कृत्य करण्याचं धाडस होणार नाही, असा कायदा करू. आंध्रसारखा कायदा करून आणि तो कायदा नेमका काय आहे. आणि त्या आणखी सुधारणा करून कडक असा कायदा करून असे आश्वास मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाबद्दल माहिती

नेहमीप्रमाणे शिक्षिका कॉलेजमध्ये शिकवायला पीडित तरुणी हिंगणघाट शहरात सोमवारी (३ फेब्रुवारी) सकाळी नंदोरी चौकवरून जात होती. यावेळी आरोपी विक्की नगराळे तिचा तिचा पाठलाग करत होता. आरोपीने पीडितेवर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती 20 ते 30 टक्के भाजली. पीडित तरुणीवर नागपूरच्या ऑरेज रुग्णालयात उपचार सरू असून पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. आरोपी हा शिक्षिका राहत असलेल्या दारोडा गावातीलच आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपूरच्या पवित्र चंद्रभागा नदीत ड्रेनेजचं पाणी

News Desk

केंद्र सरकारने जाचक रस्ते विकास सेस बंद करावा किंवा देशभरातील टोल तरी बंद करावेत !-  नाना पटोले

News Desk

युतीमुळे ठाण्यात शिवसेनेचा महापौर झाला, मात्र आता चित्र बदलेले दिसणार -आशिष शेलार 

News Desk