HW News Marathi
महाराष्ट्र

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर तुरुंगातील बंद्यांद्वारे मास्कची निर्मिती

मुंबई | कोरोना विषाणूच्या फैलावाच्या अनुषंगाने राज्यात मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातून बाजारात मास्कचा तुटवडाही निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेनुसार राज्यातील सर्व मध्यवर्ती कारागृहांमध्ये बंद्यांद्वारे मास्कनिर्मिती करण्यात येत आहे.

दरम्यान, अचानक मागणी वाढल्यामुळे राज्यात मास्कचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कारागृह बंद्यांद्वारे मास्कनिर्मिती केल्यास पुरवठ्याचे प्रमाण वाढविता येणे शक्य आहे. याबाबत देशमुख यांनी मास्कनिर्मितीची कल्पना मांडली. त्याला तुरुंग प्रशासनानेही उत्तम प्रतिसाद देत. तात्काळ मास्कनिर्मितीला प्रारंभ केला असून हे मास्क बनवून ते स्वतःही तसेच तुरुंग प्रशासनही वापरत आहे. तसेच बाजारातील तुटवडा पाहता विक्रीसाठी पुरवठादारांना देण्यात येत आहेत. बंद्यांनाही त्याचा मोबदला त्यांच्या नावावर जमा केला जातो.

राज्यात लोकल ट्रेन आणि बस सेवा बंद करण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. लोकल ट्रेन आणि बस या अत्यावश्यक सेवा असल्यामुळे त्या बंद करता येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केले आहे. मुख्यमंत्र्यांनी काल (१७ मार्च) सह्याद्री अतिथीगृहावर कॅबिनटेची बैठक बोलविली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील ३४ किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांकरिता जन-सुविधा केंद्राची उभारणी करणार! – सुधीर मुनगंटीवार

Aprna

नारायण राणेच्या उमेदवारीवर शिवसेनेचे आमदार अनिल परब यांचा आक्षेप

News Desk

बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सामाजिक न्याय विभाग अभिनव पद्धतीने साजरी करणार! – धनंजय मुंडे

News Desk