HW News Marathi
Covid-19

राज्यात आज १२ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित तर ३०२ मृत्यू

मुंबई । राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने दिलासादायक आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून आज (९ ऑक्टोबर) देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात १२ हजार १३४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३०२ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचप्रमाणे, राज्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे तब्बल १७ हजार ३२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यात एकूण १५ लाख ६ हजार १८ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी १२ लाख २९ हजार ३३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ३९ हजार ७३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यात सद्यस्थितीत २ लाख ३६ हजार ४९१ रुग्ण विविध रुग्णालयांत कोरोनावर उपचार घेत आहेत.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आई म्हणायची, भांडी वाजवू नको दळभद्री येते; मोदी महाराजांनी देशाला ताटं वाजवायला लावली”

News Desk

संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा – इंडियन मेडिकल असोसिएशनची मागणी

swarit

अमिताभजींना कोरोना,राजभवनात कोरोना ..आता तरी परिक्षांबाबत निर्णय घ्या !

News Desk