HW News Marathi
महाराष्ट्र

#Lockdown : सोशल मीडियावर धार्मिक रंग देणाऱ्यांवर सायबर सेलची कारवाई

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. प्रामुख्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून काही खोट्या बातम्या पसरवल्या जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आत्तापर्यंत राज्यात २१८ जणांवर गुन्हे दाखल केले असून ४५ आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली आहे.

राज्यात जारी केलेल्या लॉकडाऊनला कही लोकांनी धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर या बाबी प्रामुख्याने पाहायला मिळाल्या आहेत. फेसबुक पोस्ट ६६ आणि व्हॉट्सअ‍ॅपचे ९९ असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर १० जणांना अटकही करण्यात आली आहे. याबद्दलची अधिक माहिती सायबर सेलचे एसीपी बालसिंह राजपूत यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आदित्य ठाकरेंना मंत्रिपद दिलंत तसंच बहुजन युवकांचं पालकत्व स्वीकारा !

News Desk

सुरक्षेच्या कारणास्तव अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द होणार ?

News Desk

बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्याबाबत बैठक पार पडली, शर्यत पुन्हा सुरू करण्याची मालकांची मागणी

News Desk