HW News Marathi
देश / विदेश

सावधान! समाज माध्यमांमध्ये खोटी माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध होणार कठोर कारवाई

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या तर वाढत आहेच. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही चुकीची माहितीही समाजातील काही घटकांद्वारे दिली जात आहे. यावर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर यांनी समाज माध्यमांमध्ये खोटी माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध एकूण २०१ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, तर, आत्तापर्यक ३७ जणांना अटकही करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत बीड २६, कोल्हापूर १५, जळगाव १३, पुणे ११, मुंबई १०, सांगली १०, जालना ९, नाशिक ८, सातारा ७, नांदेड ७, परभणी ७, नाशिक शहर ६, नागपूर शहर ५, सिंधुदुर्ग ५, ठाणे शहर ५, बुलढाणा ४, पुणे शहर ४, लातूर ४, गोंदिया ४, सोलापूर ५, सोलापूर शहर ३, नवी मुंबई २, उस्मानाबाद २, ठाणे १, धुळे १ या ठिकाणच्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

समाजात कोरोनाविषयी चुकीची माहिती पसरवू नका. आणि जे कोणी पसरवतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. तसेच, ट्विटरवरुनही महाराष्ट्र सायबर याबद्दल जनजागृती निर्माण करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी २४ वर्षांनी अटक

News Desk

मोदींमुळे देशात आर्थिक संकटाचे सावट

News Desk

“काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा ‘चक्काजाम’ झालाय ?”, शेलारांचा बोचरा सवाल

News Desk